उस्मानाबाद : मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याचे पाकलमंत्री कोण? याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे किंवा संदिपानराव भुमरे यांची नावे आघाडीवर असून, दोघांपैकी एकाची पालकमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळेल आणि तेच पालकमंत्री असतील अशी अनेकांना अपेक्षा होती; मात्र प्रा. डॉ. सावंत यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही. त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
क्लिक करा - तोंडाला कपडा बांधून चोरांचा असा धुमाकूळ
पुन्हा अन्य जिल्ह्यातील पालकमंत्री
मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील पालकमंत्रीच येथील कारभार हाकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या पाच वर्षांत शिवसेना सत्तेत असल्याने इथे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचेच मंत्री होते. पाच वर्षांत जिल्ह्याला तब्बल चार पालकमंत्री लाभले. प्रथम डॉ. दीपक सावंत यांनी काही काळ कारभार पाहिला. त्यांच्याकडे भंडारा जिल्हाही होता. शिवाय ते राहायला मुंबईत होते. त्यांना जिल्ह्यात क्वचितच वेळ देता आला. परिणामी पालकमंत्री बदलावे लागले. त्यानंतर तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबादारी आली. स्थानिक शिवसैनिकांसोबत त्यांचे सूत जुळले नाही. त्यांनाही पालकमंत्रिपदावर पाणी सोडावे लागले. त्यानंतर पालकमंत्रिपदाची माळ अर्जुन खोतकर यांच्याकडे आली. मात्र, अंतर्गत कलहामुळे तेही बदलले. अखेर प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे शेवटच्या टप्प्यात पालकमंत्रिपदाचा कारभार आला. दरम्यान, आता निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
हे नक्की वाचा - असं कुठं असतंय का राव?
सेना नेतृत्वाकडून अन्याय?
जिल्ह्यात केवळ चारच विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी तीन आमदार शिवसेनेचे आहेत. शिवाय खासदारही शिवसेनेचाच आहे. तरीही जिल्ह्याच्या मंत्रिपदाची झोळी रिकामीच राहिली आहे. मतदारांनी सेनेच्या पारड्यात भरभरून दिले असले तरी सेना नेतृत्वाने मात्र जिल्ह्यावर अन्याय केला असल्याची भावना नागरिक बोलून दाखवीत आहेत. बाहेरच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मिळणार असल्याने गेल्या पंचवार्षिकप्रमाणे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या वाट्याला निराशा आल्याचे चित्र दिसत आहे. जेव्हा जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री होतात तेव्हा जिल्ह्याविषयी आत्मीयता ठेवून जिल्ह्याला झुकते माप मिळते. मात्र, बाहेरच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांमुळे जिल्हा राजकीयदृष्ट्या अडगळीत पडल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.