file photo 
मुंबई

हुश्श.. अखेर कोट्याहून 27 विद्यार्थ्यांसह 7 पालक परतले

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : राजस्थानमधील कोटा येथे आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्याने विद्यार्थी तेथेच अडकून होते. पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या 27 विद्यार्थ्यांसह सात पालकांना सुखरूप आणण्यात आले.

कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. पालकमंत्री तटकरे यांनी  घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे याबाबत विनंती केली. तसेच राजस्थान सरकारसोबतही त्यांनी संपर्क साधला. त्यानुसार राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विद्यार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. 

14 दिवसांचे होम क्वॉरंटाईन
28 एप्रिलला पहाटेच्या सुमारास कोटा येथून 27 विद्यार्थ्यांसह सात पालकांना  घेऊन निघालेली बस बुधवारी सकाळी 6च्या सुमारास खारघर येथे पोहचली. त्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करून होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT