मुंबई

ट्रेन बंद असल्याने 'मरे'ने प्रवाशांना दिला तब्बल एवढ्या कोटींचा परतावा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीमुळे देशभरातील ट्रेनची नियमीत रेल्वे वाहतूक बंद आहे, केवळ श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु आहेत. नियमीत ट्रेन बंद केल्यामुळे तिकीट परतावा रेल्वेने सुरु केला आहे. मध्य रेल्वेने आत्तापर्यंत 387 कोटी रुपयांचा तिकीट परतावा केला आहे. 

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे. 23 मार्चपासून ही सेवा बंद आहेत. मध्य रेल्वेने आत्तापर्यंत जवळपास 54 लाख 49 हजार प्रवाशांना तिकीटांचा परतावा दिला आहे. रेल्वेच्या निर्णयानुसार 12 ऑगस्टपर्यंत ट्रेनचे बुकिंग रद्द करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे या तारखेपर्यंतच्या सर्व तिकीटांचे आरक्षण रद्द करुन त्याबद्दलची रक्कम परत करण्या़चे ठरवले आहे. 

मध्य रेल्वेने मार्चमधील 8 लाख 80 हजार तिकीटे रद्द करुन 67 लाख 25 हजार रुपये रक्कम परत केली. अर्थातच सुटीचा कालावधी असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात तिकीट परतावाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढली. एप्रिलमध्ये 14 लाख 22 हजार तिकीटे रद्द करुन 94 कोटी 97 लाख रक्कम परत केली. मे महिन्यात यात वाढ झाली. त्या महिन्यात 16 कोटी 50 लाख तिकीटे रद्द केली आणि 1 अब्ज 16 कोटी 99 लाख रक्कम परत केली. जूनमध्ये 14 कोटी 97 लाख तिकीटे रद्द करुन एक अब्ज 7 कोटी 81 लाख रुपयांचा परतावा केला. 

तिकीटाची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरुच राहणार आहे. बारा ऑगस्टपर्यंत ट्रेन सुरु राहणार नसल्यामुळे हा परतावा सुरुच राहिल. त्यातच उपनगरी सेवा 101 दिवस बंद असल्यामुळेही रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT