मुंबई

लॉकडाऊनच्या काळात 'या' आजारात तब्बल ७० टक्के वाढ, सविस्तर वाचा

भाग्यश्री भुवड

मुंबई:  कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशभरात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, शारिरीक हालचालींची कमतरता, बैठी जीवनशैली यामुळे नागरिकांना छातीत जळजळ, ओटी पोटात दुखणे, मळमळणे गिळण्यास अडचणी, पोट खराब होणे आदी लक्षणांसह असलेल्या गॅस्ट्रोएफॅगेअल रिफ्लक्स सारख्या म्हणजेच पोटदुखीच्या आजारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली असून हे रुग्ण 25 ते 50 वर्ष वयोगटातील आहेत. 

लॉकडाऊन कालावधीमध्ये बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे एसोफेजियल रिफ्लक्स (जीईआरडी) सारख्या आजाराची तक्रार असलेले 3 ते 4 रुग्ण दिवसभरात आढळून येत असल्याचे अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबईचे लॅप्रोस्कोपिक जीआय सर्जन डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी सांगितले. 

या कारणांमुळे वाढल्या पोटाच्या समस्या

लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना आलेल्या आर्थिक अडचणी तसेच आरोग्याच्या समस्येमुळे हे नागरिक चिंताग्रस्त आहेत. चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने झोपेच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. घरबसल्या लोक अधिक तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खातात आणि शारीरिक हालचाली मात्र मंदावल्या आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. 

काय आहे जीआडी आजार?

आपण खाल्लेले अन्न तोंडातून अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये जाते. अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी एक झडप असते. ही झडप उघडली की अन्न जठरामध्ये जाते आणि झडप पूर्ण बंद होते. ही झडप बंद झाल्यामुळे अन्न आणि जठरातील आम्ल पुन्हा उलट मार्गाने अन्ननलिकेत प्रवेश करू शकत नाही. अशारितीनं एकेरी वाहतूक सुरळीत सुरु असते. ज्यांना जीईआरडीचा त्रास असतो त्या लोकांमध्ये ही झडप पूर्ण बंद होत नाही. त्यामुळे, खाल्लेले अन्न आणि जठरातील आम्ल उलट मार्गाने पुन्हा अन्ननलिकेत प्रवेश करते.

अन्ननलिकेच्या कर्करोगाचा ही धोका 

डॉ मोमीन सांगतात की, लॉकडाऊन दरम्यान अशा रुग्णांवर सध्या औषधोपचार केले जात आहेत. त्यानंतर, काही विशिष्ट प्रकरणांमध्ये एन्डोस्कोपीद्वारे मूल्यांकन केले जाते. मुळात या आजाराचे वेळीच निदान होणं गरजेचं आहे. कारण उपचारास उशीर झाल्यास गुतांगुत वाढून अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता 25 पट वाढते. अ‍ॅसिड रिफ्लक्स असणा-या रूग्णांना प्रदीर्घकाळ अँटी-एसिडिटी औषधे दिली जाऊ शकतात. ज्यामुळे आम्लाचे प्रमाण कमी होते. 

काही रुग्ण लेप्रोस्कोपिक अँटी-रिफ्लक्स शस्त्रक्रिया करणे हा पर्य़ाय सुद्धा निवडू शकतात जे अ‍ॅसिड रिफ्लक्सला प्रतिबंध करते. बहुतेक रुग्ण अँटी-रिफ्लक्स शस्त्रक्रियेच्या परिणामांमुळे समाधानी आहेत. हा पर्याय सुरक्षित आहे आणि रुग्ण लवकरच दैनंदिन कामांना सुरुवातही करू शकतो. तरी देखील या तक्रारी जाणवू नये यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, प्रमाणात अन्नपदार्थ खावेत आणि रात्री उशीरा जेवण टाळावे. जेवणानंतर लगेच न झोपू नयेत, कॉफीचे सेवन प्रमाणात करावेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

अन्ननलिकेच्या आतील अस्तर अतिशय नाजूक असते. जठरातील आम्ल या अस्तराच्या संपर्कात आले की, छातीत किंवा घशात जळजळ होते. यामुळे घशात आंबट पाणी आल्यासारखेही वाटू शकते. पोटाच्या अशा तक्रारींपासून दूर राहण्यासाठी पोषक आहार घेणे, तणावमुक्त जीवनशैलीचे पालन करणे आणि व्यायाम करणे अधिक फायदेशीर आहे.

(संपादनः पूजा विचारे)

70 percent increase patients complaining of stomach pain in lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

SCROLL FOR NEXT