मुंबई

नववी, 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे सांगत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट  (वर्गोन्नती) करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे त्यांनी नववी आणि अकरावीच्या बाबतीत आज घेण्यात आलेला हा निर्णय राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने राज्यातील इतर मंडळांच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू होणार काय, असा प्रश्न पालक आणि शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.तर या घेतलेल्या निर्णया  संदर्भात  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या  उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून या वरील अधिक माहिती देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मागील आठवड्यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पालक आणि शिक्षक संघटनांनी नववी आणि अकरावीचा निर्णयही तातडीने घ्यावा, अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे मागील काही दिवसात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी राज्यातील नववी आणि अकरावीच्या एकूणच अभ्यासक्रम आणि त्यांच्या सद्यस्थितीचा काल त्याचा आढावा घेतला होता.  त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकरावीचा अभ्यासक्रम राहिला होता अर्धवट

कोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरु होती, त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावीचा अभ्यासक्रम अद्यापही अर्धवट राहिलेला आहे. तर काही ठिकाणी नुकतेच ऑनलाईन शिकवण्या सुरुवात झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावीच्या एकूण अभ्यासक्रमाबद्दल मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी हा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत होती.त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना  पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याने या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत करण्यात आले.

शैक्षणिक नुकसान भरून काढणार

या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून यासाठी येत्या कालावधीमध्ये पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत कार्यक्रम आखणार आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

नोव्हेंबर मध्ये सुरू झाल्या होत्या शाळा

मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोना आणि लॉक डाऊन मुळे राज्यात शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालये ही 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झाली होती. यात नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी पूर्ण करता आला होता.मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यां चा अभ्यासक्रम अर्धवट राहिल्याने त्यावर स्वतंत्र कार्यक्रम आखला जाणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT