Aditya Thackeray 
मुंबई

याकूब मेमन कबर वादावर आदित्य ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, निवडणुका जवळ...

धार्मिक वाद निर्माण करायचे म्हणून काहीतरी सुरु असतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या कबरीच्या शुशोभिकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर त्यांनी पलटवार केला आहे. निवडणुका जवळ आल्या की असे मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जातात, असा आरोप त्यांनी केला आहे. (Aditya Thackeray Comment on Yakub Memon grave Controversy)

आदित्य ठाकरे म्हणाले, राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं? काय आरोप करावेत? याच्यामध्ये काहीतरी भान ठेवणं गरजेचं आहे. कारण आज जे आरोप झाले आहेत ते खोटे आणि कोणालाही पटणारे नाहीत. धार्मिक वाद निर्माण करायचे नवीन काहीतरी सुरु करायचं म्हणून असे आरोप करणं कितपत योग्य आहे. या प्रकरणात दोन-तीन गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. याकूब मेमनला दहशतवादी म्हणून फाशी दिली गेली. मात्र त्यानंतर त्याचं दफन एवढ्या मान-सन्मानानं झालं की त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याचा मृतदेह समुद्राच्या तळाशी दफन करण्यात आला. तसंच याकूब मेमनबाबत का झालं नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

मुंबई महापालिकेचा संबंध नाही

दुसरा मुद्दा म्हणजे याकूबचं पार्थिव त्यावेळच्या सरकारनं किंवा पोलिसांनी ज्यांच्या हातात दिलं, त्या ट्रस्टचं स्वरुप बघितलं तर ते खासगी आहे. यामध्ये महापालिकेचा संबंध येत नाही. पण तिसरी गोष्ट ही आहे की, महापालिकेकडून एनओसी घेणं गरजेचं आहे, ती एनओसी घेतली गेली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे १८ महिन्यांनंतर मृतदेह आणि कब्रस्तान रोटेट व्हायला हवं जे काम २०१६मध्ये व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही. तिसरी गोष्ट ज्यांनी आरोप केलेत त्यांना ही गोष्ट माहिती नाही का?

औरंगजेबाच्या कबरीबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले

दरम्यान, चौथी गोष्ट म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, असे मुद्दे उपस्थित केले जातात. यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीबाबतही प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर ती कबर केंद्राच्या अखतारित असल्याचं सत्य समोर आल्यानंतर सर्वकाही थंड झालं. त्यामुळं सत्य परिस्थिती बघून घेणं गरजेचं आहे. बोलायला काहीही बोलू शकतात. पण ज्यावेळी मेमनचं दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं? त्यामुळं आरोप करणारे नक्की कोणावर चिडलेत आमच्यावर की तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर? सन २०१५ मध्ये आम्ही भाजपसोबत सत्तेत होतो तेव्हा आमचं किती ऐकून घेतलं जात होतं? त्यावेळी पण आम्ही त्यांच्यासोबत बसून काँग्रेसलाच खूश करत होतो का? असे अनेक सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT