मुंबई

तलवार कुणा विरोधात उपसणार? विजय वडेट्टीवरांचा संभाजीराजेंना सवाल

तुषार सोनवणे

मुंबई - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांना छत्रपती संभाजीराजे आणि काही मराठा संघटनांनी विरोध केला होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी साठी तिसऱ्या पर्वाला तुळजापूरहून सुरूवात झाली. त्यात संभाजीराजे यांनी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा दिला. यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. तुळजापूर येथून त्यांनी मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वाची सुरूवात केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजेंच्या या विधानावर ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, 'राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा का? तडजोडीची भाषा असली पाहिजे. वडेट्टीवार यांनी एमपीएससी परीक्षेबाबत आपले मत व्यक्त केले आणि म्हटले की, परीक्षा होऊ द्यावी. आरक्षणाचे प्रश्न सरकार पूर्ण प्रयत्नाने सोडवित आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षाच देऊ नये हे योग्य नाही. 

वडेट्टीवरांच्या प्रतिक्रियेवर समाजमाध्यमांतून नेटकरी व्यक्त होत आहे. संभाजीराजे आणि वडेट्टीवरांच्या शाब्दिक चकमकींवरही चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT