MNS 
मुंबई

मनसेचं आता 'चलो अयोध्या', मुंबईत लागली पोस्टर्स

औरंगाबादमधील सभेनंतर आता मनसेनं राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : औरंगाबादमधील बहुचर्चित सभा पार पडल्यानंतर आता 'चलो अयोध्या' असं आवाहन मनसेनं केलं आहे. याची पोस्टर्सही मनसेनं मुंबईत लावली आहेत. या पोस्टर्समधून ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार असून नागरिकांना त्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. (Ahead of Raj Thackeray visit MNS puts up Chalo Ayodhya posters in Mumbai)

यातील काही पोस्टर्स हिंदी आणि काही मराठी भाषेत असून त्यावर मोठ्या अक्षरात 'जय श्रीराम' असं लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर मी धर्मांध नाही, मी धर्माभिमानी....असं यावर लिहिलं आहे. तसंच पुढं चलो अयोध्या असंही लिहीलं आहे. पुढे या दौऱ्याची तारीखही देण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भोग्यांच्याच विषयावर प्रामुख्यानं भाष्य केलं. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचा पुनरुच्चार यावेळी राज ठाकरे यांनी केला. तसेच मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतची डेडलाईन देतो अन्यथा दुसऱ्या दिवशीपासून मशिदींसमोर मनसेकडून हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

आपण यापुढील सभा मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात घेणार आहोत असंही यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT