मुंबई

'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'

पूजा विचारे

मुंबईः  कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच,  असे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी म्हणाले. सावदी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही आधार नाही, काही तारतम्य नसल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. महाजन समितीचा अहवाल आहे
जी गावं वादग्रस्त आहेत ती केंद्रशासित करावीत असं आपले मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याबाबत त्यांनी केलेली मागणी तिथल्या लोकांना खूश करण्यासाठी केली असेल, अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

सीमा भागातील वादग्रस्त भाग आमचा आहे असा दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री

कर्नाटक सीमावासींच्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, असे सांगताना, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार  उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. 

यापुढे  मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे, या शब्दांत ठाकरे यांनी आपला मनोदय व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती या पुस्तकातून  देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम उद्धव ठाकरे यांनी उलगडला.

ajit pawar reaction Maharashtra Karnataka Border Dispute Laxman Savadi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazil Drug Raid : पोलिसांची ड्रग्ज माफियांवर सर्वात मोठी कारवाई, छाप्यादरम्यान १३० जणांचा मृत्यू; सुप्रीम कोर्टाने अहवाल मागवला

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला? महिलांमध्ये संभ्रम, खात्यावर कधी जमा होणार पैसे?

World Cup 2025: भारत - ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी नवी मुंबईचं स्टेडियम हाउसफुल; पण पाऊस घालणार खोडा?

Cardiologist's Warning: मधुमेहाला आमंत्रण देणारे 4 पदार्थ घरात ठेवू नका- कॉर्डीओलॉजिस्टने शेअर करत दिली माहिती

Latest Marathi News Live Update : धनदांडग्यांना कर्जमाफी देऊ नका- बच्चू कडू

SCROLL FOR NEXT