Bala-Nandgaonkar 
मुंबई

सर्वपक्षीय बैठकीनंतर मनसेची भूमिका काय? नांदगावकर म्हणाले...

मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेनं ३ मे पर्यंत अल्टिमेट दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मनसेच्यावतीनं बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली होती. बैठक संपल्यानंतर त्यांनी मनसेची भूमिका माध्यमांसमोर मांडली. (All Party Meet regarding loudspeaker row Bala Nandgaonkar told MNS role)

नांदगावकर म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सहभागी झालो. मात्र, आम्ही अमच्या मतावर ठाम आहोत. याप्रकरणी मार्गदर्शक सूचना काय असाव्या हे सरकारनं ठरवलं पाहिजे. मनसेचा 3 मे रोजीचा अल्टिमेटम कायम आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही.

बैठकीत काय ठरलं?

सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, "सकाळी ६ ते रात्री १० भोंगे बंद करता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकासाठी कायदा समान असून सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागणार आहे. कायदा भंग झाला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे"

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, भोंग्यांसंदर्भातली विषयावर आम्ही केंद्राशी बोलू. इतर राज्यात काय परिस्थिती आहे ते ही तपासून घेऊ. आज बैठकीत जे जीआर निघाले त्याआधारे निर्णय घेत आहोत. पोलिसांशी बोलून नव्याने गाईडलाईन्स काढणार आहेत का? यावरही चर्चा केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT