मुंबई

भूमीपुत्रांना राज्य सरकार परत आणणार; अशी केली आहे तयारी! वाचा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः सुमारे दहा लाख स्थलांतरीत महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने आपल्या राज्यात परतणार आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला सुमारे 55 कोटी मुख्यमंत्री निधीतून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे.

राज्य सरकारने सर्व 36 जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेसह चर्चा करुन स्थलांतरीतांना माघारी पाठवण्याची योजना तयारी केली आहे. सर्व स्थलांतरीतांना पाठवण्याची प्रक्रिया काही दिवसात पूर्ण होईल अशी अपेक्षा राज्य सरकार बाळगून आहे. महाराष्ट्रातील स्थलांतरीत प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगडमधील आहेत. 
एका स्थलांतरीतास पाठवण्याचा किंवा राज्याबाहेरील स्थलांतरीतांना परत आणण्याचा खर्च सरासरी सहाशे रुपये आहे. स्थलांतरीत माघारी परतण्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
केंद्राने स्थलांतरीतांच्या प्रवासाचा 85 टक्के खर्च करण्याची तयारी दाखवली होती पण त्याबाबत काहीही रक्कम अद्याप केंद्राकडून आलेली नाही, त्यामुळे त्यांच्या तिकीटाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारकडून स्थलांतरीतांचा खर्चाची रक्कम आली नाही अशी टीका सुरु झाल्यावर रेल्वेने आम्ही श्रमिक स्पेशलच्या एका फेरीवर 80 लाख खर्च करीत आहोत, असे सांगितल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान, स्थलांतरीतांसाठी प्रत्येक जिल्ह्यांना निधी देण्यात आला आहे. त्यात मुंबई शहरला 13 कोटी देण्यात आले आहेत. त्याद्वारे 2.3 लाख स्थलांतरीत जाऊ शकतील उपनगरास 1.7 लाख स्थलांतरीत पाठवण्यासाठी 10 कोटी मिळणार आहेत. ठाणे 4.8 कोटीतून 80 हजार स्थलांतरीतांना तर पालघर 3.कोटीतून 50 हजार स्थलांतरीतांना पाठवू शकणार आहे. 

बंगालसाठी 17 ट्रेन, दिदिच्या होकाराची प्रतिक्षा
पश्चिम बंगालमधील स्थलांतरीतांना पाठवण्यासाठी 17 ट्रेनद्वारे पाठवण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने केली आहे, पण पश्चिम बंगाल सरकारने त्यास मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे ठाण्याहून हावडाला निघालेली ट्रेन रद्द करण्यात आली असे सांगितले जात आहे. आता याबाबत उद्धव ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. त्याच बैठकीत अंतिम निर्णय होईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT