मुंबई

Antilia Case: स्फोटकांच्या प्लॅनची 'या' व्यक्तिलाही होती माहिती

अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात समोर आली खळबळजनक माहिती

विराज भागवत

अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात समोर आली खळबळजनक माहिती

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाची चर्चा सुरू आहे. त्याचसोबत आणखी एका गोष्टीचीही राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सचिन वाझे प्रकरण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा तपास NIAकडून केला जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे, रियाझ काझी आणि सुनील माने या तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुनील माने याला अटक केल्यानंतर त्यानेच मनसुखच्या हत्येच्या दिवशी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला, असा दावा NIA ने केला. त्यासोबतच अंबानी स्फोटक प्रकरणात केवळ सचिन वाझेचाच हात नसून त्यासोबत आणखी एका पोलिसाला याबद्दलची माहिती असल्याची माहिती होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात NIAच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. मुंबई पोलिस दलातील निलंबित अधिकारी सुनील माने यांच्या मोबाईलमधून काही पुरावे NIAने हस्तगत केले. मनसुखची गाडी ठेवण्यासाठी जो मार्ग ठरवण्यात आला होता, त्याचा नकाशा सुनील मानेच्या मोबाईलमध्ये असल्याचं दिसून आल्याची माहिती मिळाली आहे. पण महत्त्वाचे म्हणजे मनसुख हिरेन हत्येसोबतच अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवली जाणार आहेत या प्लॅनची कल्पनादेखील सचिन वाझेसह सुनील मानेला होती असं सांगितलं जातंय. याशिवाय, सुनील माने याने मोबाइलमधून काही महत्त्वाचे पुरावे डिलीट केल्याचा संशय NIAला असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, सुनील मानेला अटक केल्यानंतर २८ एप्रिलपर्यंत NIA कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी वाढवून मिळवण्यासाठी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याची NIA कोठडी १ मे पर्यंत वाढवली. या सुनावणीदरम्यानही NIA कडून काही खळबळजनक दावे करण्यात आले. NIA च्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार, मनसुखच्या हत्येच्या आदल्या रात्री सुनील मानेने स्वत:चा फोन बंद करून स्वत:च्या बँगेत ठेवला आणि ती बँग सहकाऱ्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितली. त्यानंतर सुनील माने खासगी गाडीने कळवा येथे पोहचला. त्या ठिकाणी वाझे रुमाल खरेदी करून मानेच्या गाडीत बसला. त्यानंतर दोघं रेतीबंदर परिसरात पोहोचले. त्या ठिकाणी मानेनेच तावडे या नावाने मनसुखला फोन केला आणि बोलवून घेतलं. मनसुख तेथे आल्यानंतर खुद्द सुनील मानेनेच मनसुखच्या त्याचा फोन हिसकावून घेतला आणि विरारला गेल्यानंतर तो फोन सुरू केला, असा दावा NIAने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT