Mumbai
Mumbai Sakal
मुंबई

अंबरनाथमध्ये कचरा उचलण्यास प्रारंभ 'सकाळ' च्या बातमीने पालिकेला जाग

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : दैनंदिन कचऱ्यावर मोठ्या सोसायट्यांनी (Society) प्रक्रिया करावी, या मागणीवरून गेल्या पाच दिवसांपासून अंबरनाथमधील (Ambarnath) सोसायट्यांमध्ये (Society) साचलेला कचरा नगरपालिकेने (Municipal) न उचलल्याने कचऱ्याचे ढीग झाले होते. याबाबत 'सकाळ' (Sakal) ने आज बातमी (News) प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

सध्या सणांचे दिवस असल्याने निर्णयाला मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून अखेर नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने आज कचरा उचलून नेल्याने नागरिकांची दुर्गंधीच्या त्रासातून सुटका झाली आहे.

शहरातील १०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी सोसायट्यांतील दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलणार नसल्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. त्याबाबत सोसायट्यांना नोटिसा दिल्या होत्या. या निर्णयामुळे अंबरनाथच्या पूर्व भागातील मोठ्या गृहसंकुलांत कचरा नेला नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. गुरुवारी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गृहसंकुलातील नागरिकांशी चर्चा केली.

त्या वेळी कचरा नेला नाही, तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला होता. पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन आरोग्याधिकारी सुरेश पाटील यांनी नागरिकांना दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT