mumbai garbage 
मुंबई

बापरे! मुंबईत कचऱ्याची समस्या वाढली; मागील १० दिवसांत कचऱ्यात झाली प्रचंड वाढ..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे मुंबई पुढे कचऱ्याची समस्या वाढली आहे. मागील दहा दिवसात कचऱ्याच्या प्रमाणात तब्बल 1 हजार मेट्रीक टनने वाढ झाली आहे. तर,सफाईकामागर इतर ठिकाणी वळवल्याने अनेक भागात कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मुंबईत दिवसाला 6 हजार 300 मेट्रीक टनच्या आसपास कचरा जमा होतो. पण लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण 4 हजार 300 मेट्रीक टनवर आले होते. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी कामगारांची संख्या कमी करण्यात आली होती.

मुंबईत रोज झाडलोट आणि कचरा उचलण्यासाठी 29 हजार कामगार कार्यरत असतात. तर लॉकडाऊनच्या काळात ही संख्या 17 हजारावर आणण्यात आली होती. मात्र,गेल्या 10 - 12 दिवसांपासून कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झालीअसून रोज 5 हजार 200 मेट्रीक टन कचरा गोळा केला जात आहे. 

लॉकडाऊनच्या काळात कचरा उचलण्याच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. त्या आता जेथे तक्रारी येत आहेत अशा विभागात पुर्ववत केल्या जात असल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितले.

कचरा गाड्यांवरील चालकांना रुग्णवाहीका चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे असा दावा  विलेपार्ले येथील भाजपचे नगरसेवक अभिजीत साटम यांनी केला आहे. विलेपार्ले विभागात रस्त्यावर कचरा उचलला जात नसून याकडे आता पालिकेने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. पावसाळा सुरु झाला असून तत्काळ कचरा उचलणारी यंत्रणा पुर्ववत करावी अन्यथा आजार पसरण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

सील केलेल्या इमारतींमधील कचऱ्याची विल्हेवाट वैद्यकिय कचऱ्याप्रमाणे लावली जाते. नियमीत कचरा उचलणाऱ्या वाहनांमधून हा कचरा उचलला जात नाही. मात्र आता संपुर्ण इमारत सिल न करता संबंधित कोविड बाधित व्यक्तीचे घर अथवा मजला सिल केला जातो. मात्र,या इमारतीवर कोविडचा रुग्ण आढळल्याचा फलक लावला जातो. त्यामुळे नियमीत कचरा उचलणारे कामगार संपुर्ण इमारतीचा कचरा उचलत नाही अशाही काही तक्रारी येत आहेत.

amount of garbage has increased in mumbai read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT