Amruta Fadnavis Blackmail Case
Amruta Fadnavis Blackmail Case 
मुंबई

Amruta Fadnavis Blackmail Case: अनिक्षा जयसिंघानीची जामीनावर सुटका; १३ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

सकाळ डिजिटल टीम

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील प्रमुख आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिची जामिनावर सुटका झाली असून १३ दिवसांनंतर ती तुरुंगातून बाहेर आली आहे. फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अनिक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर कोर्टानं तिला न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यामुळं भायखळा तुरुंगात तिची रवानगी करण्यात आली होती.

अनिक्षा जयसिंघानीला कालच जामीन मंजूर झाला, मुंबई सत्र न्यायालयानं ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. गेल्या सुनावणीत अनिक्षाला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज सर्व पूर्तता झाल्यानंतर तिची भायखळा तुरुंगातून सुटका झाली. अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी देणे तसेच त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत.

याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी अमृता फडणवीसांच्या संपर्कात असल्या तरी अनिक्षा जयसिंघानी यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता. त्यांचे संबंध कायम चांगले होते, कुठल्यातरी राजकीय हेतूनं अनिक्षा यांना या प्रकरणात गोवण्याच प्रयत्न होत असल्याचा युक्तीवाद अनिक्षांच्या वकिलांनी कोर्टात केला होता. चौकशी पूर्ण झाली असून या प्रकरणात दिली जाणारी जास्तीत जास्त शिक्षा देखील जामीनास पात्र आहे. त्यामुळं विधी शाखेची विद्यार्थीनी असलेल्या अनिक्षाला जामीन मिळावा असे अनेक युक्तीवाद करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT