मुंबई

चैत्यभूमीसमोर भीमज्योत हा राजकीय डाव : आनंदराज आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारच्या माध्यमातून दादर चैत्यभूमी येथे अखंड भीमज्योत उभारली जात आहे. अशी ज्योत उभारण्याचा प्रकार म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय डाव आहे, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. हे स्मारक भव्यदिव्य व्हावे म्हणून इंदू मिलची जागा सरकाराने ताब्यात घेतली होती. इंदू मिलच्या जागेवर 2019 पूर्वी डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाईल, असे सरकारमार्फत सांगण्यात आले होते. इंदू मिलच्या जागेवर स्मारकाचा पायासुद्धा रचण्यात सरकारला अपयश आले आहे, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. 

चैत्यभूमी येथे 6 डिसेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. चैत्यभूमीचे दर्शन घेण्यासाठी 12 - 12 तास रांगेत उभे राहतात. मात्र, चैत्यभूमीजवळ असलेल्या अशोक स्तंभाजवळ भीम ज्योत उभारून जे लोक 12 तसा रांगेत उभे दर्शन घेतात. त्या लोकांनी भीमज्योतीचे दर्शन घेऊन चैत्यभूमीत जाऊ नये, असा डाव आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून आखण्यात आला आहे.

अशी भीमज्योत उभारून चैत्यभूमीचे महत्व कमी करण्याचा डाव आखला गेल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. या राजकीय डावाला आंबेडकरी जनता फसणार नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT