मुंबई

अर्णब गोस्वामी यांना उच्च न्यायालयाचा दणका! जामीन नाकारत सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश

सुनिता महामुनकर


मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मागील चार दिवसांंपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून आधी अलिबाग सत्र न्यायालयात  जामीन अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले.

दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाला डावलून उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकणार नाही. त्यामुळे फौजदारी दंड संहिता439 नुसार कनिष्ठ न्यायालयात जामीन अर्ज करावा, तसेच अलिबाग न्यायालयाने 4 दिवसांत निकाल द्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. गोस्वामी यांच्या सह अन्य दोन आरोपींनचा जामीन ही फेटाळला आहे. 

न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गोस्वामी यांनी हेबियस कौर्प्स याचिका आणि जामीन अर्ज केला आहे.  न्यायालयाने आज जामीनावर निकाल जाहीर केला.

अलिबाग पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीचे आत्महत्येचे प्रकरण न्यायालयाच्या परवानगी शिवाय तपासासाठी बेकायदेशीरपणे सुरू केले. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असून द्वेष पूर्ण हेतूने राज्य सरकारने केली आहे असा युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केला आहे. मात्र राज्य सरकार स्वतः च्या अधिकारात ए समरी अहवालाचे प्रकरण फेरतपासासाठी सुरू करु शकते असा युक्तिवाद सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अमित देसाई यांनी केला आहे. गोस्वामी यांच्या सह अन्य दोन आरोपींनीही जामीनासाठी याचिका केली आहे. 

 गोस्वामी मागील चार दिवसापासून कारागृहाच्या विलगीकरण कक्षात होते. मात्र आज त्यांना तळोजामध्ये हलविण्यात आले.

Arnab Goswamis bail rejected by High Court; Instructions to go to Sessions Court 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT