Ashish Shelar criticize Sanjay Raut today Ashish Shelar criticize Sanjay Raut today  
मुंबई

आम्हाला वेडे म्हणणाऱ्यांचीच 'पागलपंती' सुरू : आशिष शेलार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला, मात्र हा सत्तास्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणार पत्र आहे. अलीकडेच एक 'पागलपंती' नावाचा सिनेमा आला. आम्हाला सकाळी वेडे म्हणणाऱ्या लोकांचीच पागलपंती सुरू आहे. या सिनेमाप्रमाणे या लोकांचीही पागलपंती सुरू आहे,' असा टोला भाजपच्या आशिष शेलारांनी लगावला.

'कायदा सांगतो की सत्तास्थापनेचा दावा जर कोणाला करायचा असेल तर नेता लागतो. नेता कोण, मुख्यमंत्री कोण याचा उल्लेख नाही. सादर केलेल्या पत्रावर गटनेता म्हणून अधिकृत कोणाची सही नाही आणि अशा परिस्थितीत हे म्हणताता की आमच्याकडे 154 आमदारांचे पत्र आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. सध्या चालू असलेली पागलपंती आहे, अशी टीका शेलारांनी केली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला सत्ता मिळाली नाही, तर ते वेडे होतील अशी टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर देताना शेलारांनी महाविकासआघाडीची पागालपंती सुरू आहे, असे म्हणले. 

देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, परंतु आज देखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. सरकार स्थापन करण्यसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तात्काळ पाचारण करण्यात यावे अशी विनंती देखील पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. या पत्रावर शिवसेना विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT