ashish shelar and udhhav thackeray
ashish shelar and udhhav thackeray 
मुंबई

भाजप आमदार आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; विचारला 'हा' महत्वाचा प्रश्न.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली असली तरी मुर्तीची उंची व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतचे नियम अद्याप स्पष्ट न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. तयारीला लागणारा वेळ पाहता विलंब न करता राज्य सरकारने वेळीच नियमावली जाहीर करावी, अशी विनंती करीत भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

कोरोनामुळे यावेळी सर्वच सण अडचणीत आले असून आता महाराष्ट्रातील उत्सव गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे.याबाबत आपण संबंधित यंत्रणा आणि दोन्ही समिती तसेच काही मंडळे यांच्या दोन वेगवेगळ्या बैठका नुकत्याच  घेतल्या गेल्या. त्यानंतर तातडीने गणेशोत्सवाबाबतचे नियम नियमावली जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे लेखी निर्देश शासनाने जारी केलेले नाहीत.परिक्षांबाबत विद्यार्थ्यांनमध्ये जे संभ्रमाचे वातावरण झाले आहे, तसेच वातावरण गणेशोत्सवाबत निर्माण होऊ नये म्हणून वेळीच शासनाने सुस्पष्ट शासन निर्णय गणेशोत्सवाबाबत जाहीर करावा ही विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बैठकीला गणेशोत्सव समन्वय समिती आणि महाराष्ट्र गणेशोत्सव समन्वय महासंघाला बोलावण्यात आले मात्र दुसऱ्या बैठकीत त्यांना का वगळण्यात आले,  दोन्ही समित्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेश उत्सव मंडाळाच्या गणेशाची मुर्ती तीन फुट असावी अशी सूचना प्रशासनाकडून मांडली त्यावर दोन्ही समित्यांनी सहमती दर्शवली तर एक दोन मंडळांचा आक्षेप होता म्हणून पुढील बैठकीला या समित्यांचा वगळण्यात आले का असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.  

 प्रशासनाच्या सूचनेनुसार तीन फुट मुर्तीची उंची असावी यावर बहुतांश मंडळे राजी होत असतानाच आता यापेक्षा काही वेगळा निर्णय शासन घेणार की काय? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. मुर्तीच्या उंचीबाबत स्पष्टता नसल्याने कारखान्यांचा खोळंबा झाला असून त्याबाबत शासन स्पष्ट सूचाना जाहीर करावी, गर्दी टाळून बाप्पांचे दर्शन कसे उपलब्ध करुन देणार? प्रसादाचे वाटप करणार का? या काळत सोशल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळले जाणार? कोणत्या स्वरुपात कार्यक्रम असावेत? आगमन, आरती आणि विसर्जन सोहळा कसा असेल? गणेशोत्सव मंडळांना परवानग्या घेताना दरवर्षी पेक्षा यावेळी काही वेगळ्या अटींची पुर्तता करावी लागणार का? तसेच ऑनलाइन परवानग्या उपलब्ध करून देणार का असे प्रश्न शेलार यांनी पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. 

मुंबई प्रमाणे कोकणात मोठ्याप्रमाणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो व त्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि परिसरातून चाकरमानी कोकणात जातात. यावेळी त्यांना कोकणात जाण्याची परवानगी राज्य सरकार देणार की नाही, हा ही मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

ashish shelar wrote letter to CM Asked this question 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT