मुंबई : मनसुख हिरेन खुनाचा शोध निर्णायक टप्प्यावर आला असल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपवण्याची गरज काय, असा प्रश्न दहशतवाद प्रतिबंधक दलाने म्हणजेच ATS ने केला आहे. तपास यंत्रणातील दोन वेगवेगळ्या संस्था समान विषयावर तपास करत असल्या तरी त्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यास संघर्षाचे आयाम येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही यंत्रणा वेगवेगळ्या किंबहुना परस्परांच्या विरोधातील पक्षांच्या अखत्यारीत येत असल्याने येणाऱ्या काही दिवसात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचे आज एटीएसप्रमुख जयजीतसिंग यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता यासंदर्भात एनआयएने चौकशी करण्याची गरज काय असा प्रश्न केला जातो आहे.
वाझेचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी एटीएसने आता ( NIA ) एनआयए न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे.
महत्त्वाची बातमी : "पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीच्या मोठ्या रॅकेटचा 'हा' घ्या पुरावा!"
ATS is not interested to handover file of mansukh hiren case to NIA is the question
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.