लॉकडाऊनमुळे लोकल पास बुडाला? चिंता करू नका... होऊ शकतो हा निर्णय 
मुंबई

लॉकडाऊनमुळे लोकल पास बुडाला? चिंता करू नका... होऊ शकतो हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांच्या मासिक पासच्या कालावधीत वाढ करावी किंवा परतावा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या उत्तर मुंबई शाखेचे उपाध्यक्ष महेश भट्ट यांनी तसे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पाठवले आहे. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जगदीश ओझा यांनीही ही मागणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पंतप्रधानांनी संपूर्ण देशात 22 मार्चला पहिला लॉकडाऊन जाहीर केला. त्यात 14 एप्रिलला तीन आठवडे वाढ करण्यात आली. त्यानुसार 3 मेपर्यंत लोकल व लांब पल्ल्याची रेल्वेसेवा बंद राहील. 

रेल्वे बंद असल्यामुळे मासिक किंवा त्रैमासिक पास काढलेल्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने उपनगरी रेल्वेप्रवाशांना लॉकडाऊनच्या कालावधीतील पासच्या भाड्याचा परतावा द्यावा किंवा मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी भट्ट यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT