Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
मुंबई

Loksabha: महायुतीचा फॉर्मुला ठरला! जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळणार?

महायुतीत ज्याने जागा जिंकली त्यानेच ती लढवावी, अशी प्रारंभिक चर्चा झाल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. मात्र ही चर्चा अगदीच प्रारंभिक होती. राममंदिराचे वातावरण कसे तयार करता येईल, कसे कार्यक्रम करता येतील, यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

Maharashtra Politics: भाजपच्या महाशक्तीला आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची साथ मिळाली असल्याने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकण्याची व्यूहरचना करा, असा निरोप असून ज्याने जी जागा जिंकली ती त्याला असा फॉर्म्युला समोर आला आहे. मुख्यालयाच्या निरोपानंतर महायुतीत चर्चा सुरू झाली आहे.

जागावाटपाबद्दल प्रारंभिक चर्चा मुंबईत करा, असा दिल्लीहून निरोप आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची एक बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील विद्यमान सत्तासमीकरण तसेच ठेवून ज्याने ज्या जागा जिंकल्या त्या त्याच पक्षाने लढवाव्यात, असा विचार समोर आल्याचे समजते.

महायुतीत ज्याने जागा जिंकली त्यानेच ती लढवावी, अशी प्रारंभिक चर्चा झाल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. मात्र ही चर्चा अगदीच प्रारंभिक होती. राममंदिराचे वातावरण कसे तयार करता येईल, कसे कार्यक्रम करता येतील, यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

भाजपने किमान २८ ते ३० जागा लढवाव्यात, असा एक मतप्रवाह आहे. अजित पवार गटाकडे सध्या एकच खासदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या सर्व जागा त्यांनी लढवाव्यात का, यावरही विचार करण्यात आला. भाजपमध्ये जागांबाबत महाराष्ट्राच्या नेत्यात लवकरच विचारमंथन होणार आहे; मात्र सध्या ज्याने ज्या जागा जिंकल्या त्या त्याच्याच, हे सूत्र लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटात असलेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांत सभा घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

५१ टक्के मते मिळवणे हे उद्दिष्ट भाजपने सहकारी मित्रपक्षांसमोर ठेवले आहे.भाजपने किमान २८ ते ३० जागा लढवाव्यात, असा एक मतप्रवाह आहे. अजित पवार गटाकडे सध्या एकच खासदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या सर्व जागा त्यांनी लढवाव्यात का, यावरही विचार करण्यात आला. भाजपमध्ये जागांबाबत महाराष्ट्राच्या नेत्यात लवकरच विचारमंथन होणार आहे; मात्र सध्या ज्याने ज्या जागा जिंकल्या त्या त्याच्याच, हे सूत्र लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटात असलेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांत सभा घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ५१ टक्के मते मिळवणे हे उद्दिष्ट भाजपने सहकारी मित्रपक्षांसमोर ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SWAYAM Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SWAYAM जानेवारी 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षा कधी होणार

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

SCROLL FOR NEXT