Bhai Jagtap
Bhai Jagtap 
मुंबई

BKC MVA Rally: गद्दारी झाल्यानंतर सोनिया गांधींनी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला अन्...; भाई जगतापांनी केला खुलासा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १ मे रोजी बीकेसीतील मैदानात पार पडली. यावेळी आघाडीतील नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. यावेळी राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. याबाबतचा खुलासा मुंबई काँग्रेसचे प्रमुख भाई जगताप यांनी केला. (BKC MVA Rally Sonia Gandhi made first call to Uddhav Thackeray Bhai Jagtap disclosed truth)

भाई जगताप म्हणाले, "ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गिळंकृत करण्याचं पाप आत्ताच्या असंविधानिक सरकारनं केलं. अशा वेळेस आमच्या नेत्या सोनिया गांधी, राज्यातील नेत्यांनी निर्णय घेतला, राष्ट्रवादीच्या पवारांनी निर्णय घेतला. आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि या राक्षसाविरोधात लढणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे असं त्यांनी म्हटलं.

ही तुटकी फुटकी महाविकास आघाडी नाही. कारण ज्यावेळी महाराष्ट्रात गद्दारी झाली तेव्हा सर्वात आधी पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि सांगितलं की, "जे काही होईल ते होऊ द्या काँग्रेस तुमच्यासोबत आहे, कायम तुमच्या सोबत आहोत" हा विश्वास सोनिया गांधींनी दिला, असं यावेळी भाई जगताप यांनी सांगितलं.

कदाचित उद्धव ठाकरेंना आणि आमच्या सर्व नेत्यांना आता ही गोष्ट खरी वाटेल ज्यांच्यासोबत पंचवीस वर्षे सोयरिक केली त्यांनी खंजीर खुपसलं पाठीत. यांचा इतिहास हाच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा इतिहास नाही. बोक्याचं लक्ष्य शिक्यावर अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. महापालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवींवर यांचं लक्ष आहे, पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता, असा आरोपही यावेळी भाई जगताप यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

SCROLL FOR NEXT