Bhai Jagtap 
मुंबई

BKC MVA Rally: गद्दारी झाल्यानंतर सोनिया गांधींनी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला अन्...; भाई जगतापांनी केला खुलासा

ज्यावेळी शिवरायांच्या महाराष्ट्राला गिळंकृत करण्याचं पाप आत्ताच्या असंविधानिक सरकारनं केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १ मे रोजी बीकेसीतील मैदानात पार पडली. यावेळी आघाडीतील नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. यावेळी राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. याबाबतचा खुलासा मुंबई काँग्रेसचे प्रमुख भाई जगताप यांनी केला. (BKC MVA Rally Sonia Gandhi made first call to Uddhav Thackeray Bhai Jagtap disclosed truth)

भाई जगताप म्हणाले, "ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गिळंकृत करण्याचं पाप आत्ताच्या असंविधानिक सरकारनं केलं. अशा वेळेस आमच्या नेत्या सोनिया गांधी, राज्यातील नेत्यांनी निर्णय घेतला, राष्ट्रवादीच्या पवारांनी निर्णय घेतला. आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि या राक्षसाविरोधात लढणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे असं त्यांनी म्हटलं.

ही तुटकी फुटकी महाविकास आघाडी नाही. कारण ज्यावेळी महाराष्ट्रात गद्दारी झाली तेव्हा सर्वात आधी पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि सांगितलं की, "जे काही होईल ते होऊ द्या काँग्रेस तुमच्यासोबत आहे, कायम तुमच्या सोबत आहोत" हा विश्वास सोनिया गांधींनी दिला, असं यावेळी भाई जगताप यांनी सांगितलं.

कदाचित उद्धव ठाकरेंना आणि आमच्या सर्व नेत्यांना आता ही गोष्ट खरी वाटेल ज्यांच्यासोबत पंचवीस वर्षे सोयरिक केली त्यांनी खंजीर खुपसलं पाठीत. यांचा इतिहास हाच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा इतिहास नाही. बोक्याचं लक्ष्य शिक्यावर अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. महापालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवींवर यांचं लक्ष आहे, पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता, असा आरोपही यावेळी भाई जगताप यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT