मुंबई

धोकादायक इमारतींच्याविरोधात महापालिकेची नोटीस; थेट वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यास सुरवात

समीर सुर्वे

मुंबई : धोकादायक इमारतींच्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. शिव कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीतील धोकादायक इमारतींचे विज पाणी कापण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

या कॉलनीतील 25 इमारती धोकादायक असून त्यातील 18 इमारतींचे विज पाणी काल (मंगळवारी) कापण्यात आले आहे. तर उर्वरीत 7 इमारतीचे विज पाणी आज कापण्यात येणार आहे.धोकादायक इमारत रिकामी करण्याची नोटीस दिल्यानंतर मुदतीत इमारत रिकामी न झाल्यास पालिकेकडून विज पाणी कापण्याची कारवाई केली जाते.

फोर्टयेथील भानुशाली इमारत दुर्घटना, डोंगरी येथील मिश्रा इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला आहे. सायन कोळीवाडा येथील पंजाब काॅलनीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने पुर्वी पाठवलेल्या नोटीसला रहिवाशांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने या इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश रहिवाशांना दिले. त्यानुसार पालिकेने ही कारवाई सुरु केली आहे.

या 25 इमारतीमधिल प्रत्येक इमारतीत 48 खोल्या आहेत.या कॉलनीतील 70-80 टक्के रहिवाशी यापुर्वीच इमारत सोडून गेले आहेत.तर 20-30 टक्के रहिवाशांमुळे कारवाई रखडली होती.न्यायालयाचे आदेश मिळताच पालिकेने रहिवाशांना 48 तासात घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली.त्यानंतर कारवाई सुरु केली.\

( संपादन - सुमित बागुल ) 

BMC started taking action against dangerous and old buildings in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT