मुंबई

सुशांत सिंह प्रकरण: बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल महापालिकेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती, म्हणालेत...

अनिश पाटील

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपस करण्यासाठी बिहारमधून मुंबईतील गोरेगांवमध्ये आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेर क्वारंटाईन केले, या आशयाच्या काही बातम्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाल्यात. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली 

बिहार राज्यातून आलेले पोलिस अधिकारी मुंबईतील गोरेगांव पूर्वमधील राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) ग्रुप ८ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाकडे प्राप्त झाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार होम क्वारंटाइन करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेचे पथक काल (दिनांक २ ऑगस्ट २०२०) सायंकाळी सदर विश्रामगृहावर पोहोचले.

महानगरपालिकेच्या पथकाने, बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तिंसाठी लागू असलेली होम क्वारंटाइन बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱया व्‍यक्तिंसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.

त्यासोबतच, त्यांना माहिती देण्यात आली की, राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे.  

( संपादन - सुमित बागुल )

bruhanmumbai municipal corporation released information about bihar cop vinay tiwari in SSR case   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT