मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोड (Ghatkopar-mankhurd flyover) रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या नामकरणावरुन (flyover naming) भाजपने (bjp) शिवसेनेची (shivsena) कोंडी केली आहे. महापालिकेच्या होणाऱ्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (condolence to babasaheb purandare) यांना श्रध्दांजली वाहाण्यात येणार आहे. याचवेळी या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे नाव देण्याचा ठराव करावा अशी मागणी भाजपने महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्याकडे केली आहे.
या उड्डाण पुलाच्या नामकरणाचा प्रस्ताव गेल्या दिड वर्षांपासून प्रलंबीत आहे.त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भाजपकडून या नामकरणासाठी वेळोवेळी मागणी केली जात आहे.मात्र,त्यावर निर्णय होत नाही. १ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या उड्डाण पुलाचे उदघाटन केले. त्यापुर्वी प्रशशसनाने पुल वाहतुकीसाठी सुरु होत नसल्याने नामकरण करण्यास असमर्थता दर्शवली होती. मात्र,आता पुलही वाहतुकीसाठी सुरु झाला आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शिवकार्यात वेचले आहे. येत्या महासभेत बाबासाहेब यांना श्रध्दांजली वाहाण्यात येणार आहे. त्याचबरोबर या पुलाच्या नामकरणाचा ठरावही करावा अशी मागणी भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी महापौर पेडणेकर यांना दिले आहेत. हा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ करणे हे शिवप्रेमींच्या दृष्टीने करंटे पणाचा ठरेल. शिवसेना महाराष्ट्राची अस्मीता असलेल्या छत्रपतींना विसरली की यात दुसरा कोणता राजकीय डाव आहे असा संशयही शिंदे यांनी उपस्थीत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.