मुंबई

सत्ताधाऱ्यांनी राज्यात होणाऱ्या महिलांवर अत्याचारांविरोधातही आंदोलने करावीत; चित्रा वाघ यांचा सरकारला टोला

कृष्ण जोशी

मुंबई ः हाथरस बलात्काराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधातही आंदोलने करावीत, राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही त्याविरोधातही आंदोलने करावीत, असा टोला प्रदेश भाजप उपाध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

आरे येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर आज श्रीमती वाघ यांनी त्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी विभागाच्या पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. यावेळी उपायुक्त कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मागणी केली. 

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. राज्यात स्त्रीयांवरील अत्याचाराच्या घटना सतत घडत असून त्या लज्जास्पद आणि चिंताजनक आहेत. राज्यातील मुलींच्या अब्रूचे सरकारला काही महत्व वाटते का, हा माझा प्रश्न आहे. देशात कोणाही मुलीवर असा प्रसंग ओढवू नये, पण इथे यानिमित्ताने दोन राज्यातील नेत्यांमध्ये सुरु असलेल्या वादामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा मागे पडू नये, याची चिंता माझ्यासारख्या कार्यकर्तीला सतावते आहे, असेही त्या म्हणाल्या. 

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काल हाथरस घटनेविरोधात आंदोलन केले, त्यांनी जरुर आंदोलन करावे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाहीत यासाठीही त्यांनी आंदोलने करावीत. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही, यासाठीही त्यांनी आंदोलने करावीत. महिला बालकल्याण मंत्र्यांनी अध्यक्षपदासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रे लिहिली, पण आता ती फाईलच मिळत नाहीये. आयोगासमोर महिलांबाबतची चार हजार प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांची सुनावणी कोण करणार, महिलांच्या मुद्यांसंदर्भात हे सरकार उदासीन का, याचे उत्तर मिळायला हवे, असेही श्रीमती वाघ म्हणाल्या. 

राज्यातील कोविड केंद्रात बलात्कार आणि विनयभंगाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासंदर्भात सरकारने एसओपी जारी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. देशातील घटनांकडे जरुर लक्ष द्या, पण त्याचबरोबर राज्यातील घटनांकडेही दुर्लक्ष होऊ नये. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम चालवली जात आहे. मात्र आम्हीही तुमच्याच कुटुंबाचा भाग आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या रक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील महिला अत्याचारांविरोधातही राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आंदोलने करावीत, असेही त्यांनी ठणकावले.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT