मुंबई

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थांमध्ये चुरस; नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण...

तेजस वाघमारे


मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 18.2 टक्केनी वाढला आहे. तर सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही 95 टक्क्यांच्या पार लागल्याने यंदा नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे.

दरवर्षी दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक विलंब झाला. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने राज्य मंडळाचा दहावीचा शेवटचा पेपर होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढल्याने अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण विद्यार्थाना देण्यात आले.

त्यामुळे राज्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्येही 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होणार आहे. याचबरोबर प्राविण्यासह प्रथम आलेल्यांमध्ये 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 60 टक्के आणि त्यापुढे गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 17 हजार 819 इतकी आहे. यामुळे मुंबई आणि परिसरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पहावयाला मिळणार आहे. मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी तीन लाख 20 हजार जागा आहेत.

------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेसवेवर मोठा अपघात, भाजपा आमदारांच्या ताफ्यातील गाडीला ट्रकची धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Crime: घरातून आरडाओरडा; शेजारच्यांनी दरवाजा उघडताच सर्वत्र रक्त दिसलं, ६० वर्षीय २ व्यक्तींचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Karad Flyover Trial: कऱ्हाड उड्डाणपुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू; दोन वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर विराम

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

SCROLL FOR NEXT