मुंबई

कोरोनाने कृषी पर्यटन देशोधडीला 

गिरीश त्रिवेदी

बदलापूर : "निसर्गाने झोडपले आणि राजाने मारले तर बळीराजाने न्याय कोणाकडे मागायचा? अशी अवस्था अंबरनाथ तालुक्‍यातील कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्यांची झाली आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन सुरू केल्याने दोन पैसे गाठीला येतात. मात्र यंदा 26 जुलै आणि 4 ऑगस्ट 2019 रोजी आलेला महापूर आणि त्यातून सावरत नाही तोच कोरोनारुपी आलेल्या संकटामुळे या उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतकी वर्ष मेहनत करून, जीवापाड जपून वृक्ष संपदा वाढवल्याने पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एकामागोमाग येणाऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. 

12 महिने वाहणाऱ्या उल्हास आणि बारवी नदीकाठी असंख्य शेतकरी शेती करतात. तर काही शेतकरी हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन करीत आहेत. कृषी पर्यटनामुळे असंख्य बेरोजगार कुटुंबांना रोजगार मिळत आहे. मात्र, कोरोना संचारबंदीमुळे ज्या प्रमाणे उद्योग व्यवसायांना फटका बसला तसाच तो शेतीपूरक उद्योगांनाही बसला आहे.

त्यात कृषी पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. उल्हास आणि बारवी नदीकिनारी असलेल्या अनेक कृषी पर्यटन केंद्रांमध्ये वर्षभर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी विविध ठिकाणांहून नागरिक हमखास येत असतात. 

अंबरनाथ तालुक्‍यातील वांगणीजवळील काराव गावातील देशमुख बंधूंच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये तर वर्षभर हजारो पर्यटक येत असतात. यंदा या परिसरात अक्षरश: शुकशुकाट आहे. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात वर्षा सहलींसाठी कुणी आलेच नाही.

त्यामुळे तो सीझन तर वाया गेलाच शिवाय महापुरामुळे कृषी पर्यटन केंद्राची पूरती वाताहत झाली. आता शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा झाल्या की कृषी पर्यटनातून चार पैसे सुटतील, अशी आशा बाळगून होतो. मात्र कोरोना संचारबंदीमुळे ही संधीही वाया गेल्याचे दिलीप देशमुख यांनी सांगितले. 

कामगारांचाही सांभाळ... 
कृषी पर्यटन केंद्र चालवण्यासाठी बहुतेकांनी महिना आठ, दहा हजार रुपये वेतनावर माणसे कामाला ठेवली आहेत. संचारबंदीमुळे व्यवसाय ठप्प असला तरी या कामगारांना त्यांना सांभाळावे लागते. शिवाय पर्यटन केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामेही नियमित करावी लागतात. यात कामावर ठेवलेले कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा सांभाळ सुद्धा हे शेतकरीच करीत असतात. इतक्‍या वर्षांपासून कामगारांशी कौटुंबीक नाते तयार झाले असते. त्यामुळे उत्पन्न असो किंवा नसो शेतकरी त्यांना सोडत नसल्याचे चित्र या भागात पहायला मिळते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Market Yard Traffic Advisory : बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनामुळे मार्केटयार्डात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग बदल!

‘महाडीबीटी’वरील शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंमती बंद! ट्रॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची थांबली खरेदी; निधीची गरज ३१,८३२ कोटींची अन्‌ आहेत अवघे ११८९ कोटी रुपये

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT