IIT Bombay  sakal mumbai
मुंबई

आयआयटी आणि कस्तुरबा रुग्णालयाचे संशोधन; कोरोना आणि त्याची तीव्रता समजणार

संजीव भागवत

मुंबई : एखाद्या रुग्णाला कोरोना (corona patient) आणि त्याचा संसर्ग झाल्यानंतर त्याची नेमकी तीव्रता किती आहे, हे आता काही लवकरच समजणार आहे. यासाठी आयआयटी मुंबई (IIT Mumbai) आणि कस्तुरबा रुग्णालयातील (Kasturba hospital) संशोधकांनी याबाबत केलेला अभ्यास नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयसायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी कौन्सिल फॉर सायन्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्च (CSIR) ने निधी उपलब्ध करून दिला होता.

आयआयटी मुंबई आणि कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अभ्यास केला असून त्यात त्यांनी रुग्णाच्या शरीरामध्ये विशिष्ठ प्रकारचे प्रोटीन किती प्रमाणात आढळते त्यावरुन आजाराची तीव्रता लक्षात येऊ शकते असा निष्कर्ष काढला आहे. त्याच आधारावर कोरोना आणि त्याची तीव्रता लक्षात घेता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या जैव विज्ञान आणि जैव इंजिनीअरिंग विभागाच्या प्रा. कृती सुवर्ण यांनी सांगितले की, कोणत्याही आजारावर सुरुवातीच्या काळात औषध निर्मिती करण्याची प्रक्रिया खूप अवघड आणि वेळखाऊ असते यामुळे यासाठी जास्तीत जास्त अभ्यास होणे आवश्यक आहे.

तर या संशोधन टीमचे प्रमुख डॉ. संजीव श्रीवास्तव यांनी उपचारादरम्यान रुग्णाच्या शरीरात वारंवार बदल होत असतात. त्यावर देखरेख ठेवता यावी या उद्देशाने या अभ्यासचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यामुळे उपचार करणेही अधिक सुलभ होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी यासाठी संशोधकांनी ‘सिलेक्टेड रिअॅक्सन मॉनिटरिंग’ (एसआरएम) प्रणालीचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT