Nana-Patole 
मुंबई

केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी- नाना पटोले

विराज भागवत

मुंबई: कोरोना प्रतिंबधक लसीवरून सध्या केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार असा सामना रंगला आहे. केंद्रातील सरकार लसपुरवठ्याच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचे मत ठाकरे सरकारकडून व्यक्त केलं जात आहे. तर देशाच्या लसीकरण मोहिमेला महाराष्ट्राने खोडा घातला असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं आहे. या वक्तव्यावर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. "गेल्या वर्षापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय. पुन्हा कोरोना झपाट्याने वाढतोय. या स्थितीत राज्य सरकारकडून सातत्याने केंद्राकडे लस, आर्थिक मदत मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी", अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

"भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतंय. रक्ताचा पुरवठा सध्या कमी आहे. आम्ही राज्यभर रक्तदान शिबिर घेतोय. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करणार आहोत. आम्ही कोरोनामुक्त बुथ असं नवं अभियान सुरू करतोय. कोरोना वॉर रुम प्रत्येक जिल्ह्यात सुरू करतोय. लोकांच्या मदतीसाठी ही वॉर रुम सक्षम असेल. काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाईनही सुरू केली जाणार आहे", अशी माहिती पटोले यांनी दिली.

"महाराष्ट्र राज्य दिवसाला ४ लाख चाचण्या करत आहे. उत्तर प्रदेशात १ लाख चाचण्या केल्या जातात. जास्त चाचण्या करून आम्ही राज्यातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कोरोना आपत्ती ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळतंय", असा आरोप त्यांनी केला.

महिनाअखेरीपर्यंत १० हजार बॉटल्स रक्तसाठा करण्याचा काँग्रेसचा निर्धार

काँग्रेसकडून रक्तदान मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेची सुरूवात उत्तर मुंबईतून करण्यात येईल. मुंबईच्या आयुक्तांनी सांगितलं आहे की रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही 10 हजार बॉटल्स रक्तसाठा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ ते ३० एप्रिल या काळात ही मोहीम राबवण्यात येईल. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्या मालाड मालवणी मतदारसंघातून याला सुरुवात होणार आहे. १२ तारखेपासून या मोहिमेला सुरुवात होईल. मुंबईतील अनेक अल्पसंख्याक समाज असणाऱ्या भागात रक्तदान कॅम्प होतील", अशी माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT