मुंबई

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत संजय राऊत यांचं 'मोठं' विधान, उपस्थित केली गंभीर शंका

सुमित बागुल

मुंबई : भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल जगभरातून घेतली जातेय. जगभरातील माध्यमांचं आपल्यावर लक्ष आहे. उद्या दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, ट्रॅक्टर परेड निघणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इतर विविध आंदोलने सुरु आहेत.

मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी एकत्रित आलेले आहेत. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुंबईत दाखल झालेत. मात्र असं असलं तरीही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असताना मुंबईतून अजूनही कोरोना गेलेला नाही त्याची काळजी घ्यायला हवी. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने नवीन संकट पुन्हा महाराष्ट्रात पसरेल अशी चिंता मुख्यमंत्र्यांना आहे असं संजय राऊत म्हणालेत . 

केंद्र आडमुठी भूमिका घेतंय का ? 

हा देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, गेले साठ दिवस दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करतायत. शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचा फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड असा एक विक्रम सरकार प्रस्थापित करतंय. शेतकऱ्यांची चर्चेची पहिली फेरी झाली तेंव्हाच विषय निकाली लागला असता आणि मोदी सरकारची प्रतिष्ठा वाढली असती. भविष्यात सरकारला तसं करावंच लागणार आहे. साठ दिवस शेतकऱ्यांना तंगवून देशाच्या प्रजासत्ताक दिनी, शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरु ठेवून तुम्हाला देशातील वातावरण बिघडवायचं आहे का ? असं काही कारस्थान दिसतंय का ? या शंका लोकांना यायला लागल्या आहेत.  

शेतकरी शेकडो मैलांची पायपीट करून दिल्ली आणि मुंबईत येत आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्रित यायला हवं. भाजपातील प्रमुख लोकांनाही हा प्रश्न लवकरच सुटावा असं वाटतंय. मात्र ते आतल्याआत गुदमरलेले आहेत, त्यांना स्पष्ट बोलता येत नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.  

Delhi farmers protest mumbai farmers march reaction of sanjay raut on central government

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT