मुंबई

विक्रमगडमध्ये बसस्थानकाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड तालुक्‍याच्या ठिकाणी अद्ययावत एस. टी. बसस्थानकच नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळयात पावसात तासन्‌ तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्‍यातील मुख्य शहराचे ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत गेल्या 20 वर्षांपासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. 

विक्रमगड तालुक्‍याची लोकसंख्या जवळपास दीड लांखाच्या घरात जाऊन पोहचली आहे; तर विक्रमगड शहराची लोकसंख्या 25 हजारावर गेली आहे. येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजित 60 ते 70 एस.टी. बस ये-जा करतात. विक्रमगड शहर हे तालुक्‍याचे मुख्यालय असल्याने अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. येथे केवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पिकअप शेड आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. ही पिकअप शेड त्या वेळेस खासदार निधीतून 20 वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

प्रवाशांची मोठी गैरसोय 
विक्रमगड शहर हे तालुक्‍यातील 94 गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव, खेड्यापाड्यातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात; मात्र शहरात अद्यापही अद्ययावत असे एस.टी. बसस्थानक नाही. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधगृह, पिण्याचे पाणी आदी सोय नसल्याने अशा प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT