मुंबई

विक्रमगडमध्ये बसस्थानकाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड तालुक्‍याच्या ठिकाणी अद्ययावत एस. टी. बसस्थानकच नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळयात पावसात तासन्‌ तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्‍यातील मुख्य शहराचे ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत गेल्या 20 वर्षांपासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. 

विक्रमगड तालुक्‍याची लोकसंख्या जवळपास दीड लांखाच्या घरात जाऊन पोहचली आहे; तर विक्रमगड शहराची लोकसंख्या 25 हजारावर गेली आहे. येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजित 60 ते 70 एस.टी. बस ये-जा करतात. विक्रमगड शहर हे तालुक्‍याचे मुख्यालय असल्याने अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. येथे केवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पिकअप शेड आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. ही पिकअप शेड त्या वेळेस खासदार निधीतून 20 वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

प्रवाशांची मोठी गैरसोय 
विक्रमगड शहर हे तालुक्‍यातील 94 गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव, खेड्यापाड्यातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात; मात्र शहरात अद्यापही अद्ययावत असे एस.टी. बसस्थानक नाही. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधगृह, पिण्याचे पाणी आदी सोय नसल्याने अशा प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT