मुंबई

विक्रमगडमध्ये बसस्थानकाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड तालुक्‍याच्या ठिकाणी अद्ययावत एस. टी. बसस्थानकच नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळयात पावसात तासन्‌ तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्‍यातील मुख्य शहराचे ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत गेल्या 20 वर्षांपासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. 

विक्रमगड तालुक्‍याची लोकसंख्या जवळपास दीड लांखाच्या घरात जाऊन पोहचली आहे; तर विक्रमगड शहराची लोकसंख्या 25 हजारावर गेली आहे. येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजित 60 ते 70 एस.टी. बस ये-जा करतात. विक्रमगड शहर हे तालुक्‍याचे मुख्यालय असल्याने अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. येथे केवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पिकअप शेड आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. ही पिकअप शेड त्या वेळेस खासदार निधीतून 20 वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

प्रवाशांची मोठी गैरसोय 
विक्रमगड शहर हे तालुक्‍यातील 94 गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव, खेड्यापाड्यातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात; मात्र शहरात अद्यापही अद्ययावत असे एस.टी. बसस्थानक नाही. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधगृह, पिण्याचे पाणी आदी सोय नसल्याने अशा प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT