जव्हार ः पावसामुळे पिवळी पडलेली भातपिके.
जव्हार ः पावसामुळे पिवळी पडलेली भातपिके.  
मुंबई

जव्हारमध्ये पावसाने पळवले बळीराजाच्या तोंडचे पाणी

सकाळ वृत्तसेवा

जव्हार ः जव्हार तालुक्‍यात शेतकरी उदरनिर्वाहासाठी हंगामी पीक घेतात. त्यामध्ये भात हे प्रमुख पीक असून ते कापणीसाठी तयार झाले असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

ऑक्‍टोबर सरत आला. दिवाळीचा सण जवळ आला, तरीही रोज परतीचा पाऊस सुरू असल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसामुळे भातकापणीची कामे खोळंबली असून हातचे पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन कंपनी सुरू केली आहे. त्यानंतरही पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने भातकापणी पूर्णतः थांबली आहे. काही शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून कापलेले भातपीक सुकत नसल्याने नुकसानीत भर पडत आहे.

जव्हार तालुक्‍यातील शेतकरी हा फक्त हंगामी पिकावर वर्षभराची गुजराण करतो; मात्र परतीचा पाऊस थांबत नसल्याने भातपीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने भातपीक चांगल्या प्रकारे तयार झाले होते. त्यामुळे उत्पन्नात भर पडेल या आशेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच या परतीच्या पावसाने पळवले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT