मुंबई

जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत शाळेची घंटा बंद! वाचा कोण म्हणतंय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीची साथ मुंबई तसेच उपनगरात वाढत आहे. मात्र त्याचवेळी शाळा सुरु करण्याबाबत विचार होत आहे. आता जोपर्यंत कोरोनावरील लस तयार होत नाही, तोपर्यंत शाळा सुरु न करण्याची विनंती पालकांच्या संघटनेने केली आहे. त्यांनी यासंदर्भात महाराष्ट्राच्या शैक्षणिक मंत्री वर्षा गायकवाड यांना सूचनांचे निवेदन दिले असल्याचे समजते.

राज्यातील शाळा सुरु करण्याची घाई सरकारने करु नये. त्यामुळे विद्यार्ध्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असेल. जोपर्यंत कोरोनावरील लस मिळत नाही, तोपर्यंत ऑनलाईन लर्निंग सुरु ठेवता येईल. सध्याच्या परिस्थितीत अनेक पालक मुला-मुलींना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, असे अनुभा सहाय यांनी सांगितले. सहाय या इंडिया वाईड पॅरेंटस्् असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. 
शाळा सध्या सुरु न करण्याची प्रमुख मागणी असली तरी त्याबरोबरच शाळा बंद असतानाही त्यांचे व्यवस्थापन शुल्कासाठी पालकांवर दबाव आणत असल्याची तक्राही करण्यात आली. शाळा बंद असल्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला आहे, तरीही शुल्कात कपात केलेली नाही. शैक्षणिक विभागाने पालकांच्या सर्व तक्रारीची आम्ही दखल घेत असल्याचे सांगितले.

दरम्यान, शाळांचे शुल्क न देणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप अनेक पालंकाकडून होत आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून रोखले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT