उद्योजकांनी पुकारला बेमुदत बंद! वाचा नेमकं काय झालं.. 
मुंबई

उद्योजकांनी पुकारला बेमुदत बंद! वाचा नेमकं काय झालं...

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील २१ कारखान्यांना उत्पादन बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासकीय यंत्रणांनी एकाच वेळी या परिसरातील उद्योगांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे या अन्यायाविरोधात डोंबिवलीतील उद्योजकांनी कामगारांसह बेमुदत बंदचे आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत याबाबत चर्चा करण्याचे प्रयत्न उद्योजक संघटनेच्या माध्यमातून होत आहेत.

ही बातमी वाचली का?...आता ऐतिहासिक किल्ल्यांवर पोलिसांचा पहारा!

विविध रंगांचा पाऊस, गुलाबी रस्ते, सततच्या आगीच्या घटना यांसारखे प्रकार डोंबिवलीत समोर येत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांनी कारखान्यांना टाळे ठोकावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रदूषणकारी कारखाने बंद करण्यात येतील, असे स्पष्ट संकेतही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही उद्योगांच्या थकीत मालमत्ता करासाठी नोटीस पाठवली आहे. तसेच औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर आराखड्यापेक्षा अधिकचे बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणांकडून होत असलेल्या या अन्यायाविरोधात उद्योजकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. 

डोंबिवलीत प्रदूषणाचे प्रमाण कमी असावे. यासाठी उद्योजक कायमच प्रयत्नशील आहेत; परंतु विविध सरकारी विभागांनी एकाच वेळी कारवाई सुरू करत कारखान्यांना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी दिलेली नाही, अशी संधी न देणे हा उद्योगांवर अन्याय आहे. 
- देवेन सोनी, अध्यक्ष, कल्याण-डोंबिवली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नको'', आरोपींकडून कोर्टात अर्ज; कारणही सांगितलं

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीत अपघात

Putrada Ekadashi 2025: यंदा 30 की 31 डिसेंबर कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या अचूक तारीख, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व

Asia Cup U19: भारताने दिलेली जखम पाकिस्तानच्या जिव्हारी! उपांत्य फेरीत न खेळताच जाणार घरी; बांगलादेश फायनलला पोहोचणार

SCROLL FOR NEXT