मुंबई

"संपूर्ण ठिकरा उद्धव ठाकरेंवर फोडायचा आणि आपण नामनिराळं राहायचं"

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. गेल्या काही दिवसतात अनेक बड्या नेत्यांचा राज भावनांवर राबता पाहायला मिळाला. अशात महाराष्ट्रात राजकीय गणित बदलणारा का? महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार का? या चर्चांना उधाण आलं. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. महाराष्ट्रात आम्हाला सरकार स्थापन करण्यात कोणतीही घाई नसल्याचं फडणवीस म्हणालेत. 

राणे हे अन्याय सहन करू शकत नाही :  

नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. नारायण राणे हे भाजपातील जेष्ठ नेते आहेत. राणे हे अन्याय सहन करू शकत नाही आणि थेट बोलतात आणि म्हणूनच त्यांनी एकंदरीत राज्यातील परिस्थिती पाहता त्यांचं स्वतःचं मत मांडलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

राहुल गांधी यांच्या विधानावर आश्चर्य

याचसोबत फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केलंय. महाराष्ट्रात काँग्रेसने सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्रातील सरकारचा काँग्रेस एक भाग आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वक्तव्य जबाबदारी झटकणारं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खापर फोडण्याचा हा प्रयत्न असल्याचं मत मत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडलंय.

केंद्राकडून २८ हजार १०४ कोटींची मदत

केंद्राकडून महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही असं चित्र निर्माण केलं जातंय. वारंवार चुकीचं सांगितलं गेलं तर लोकांना तेच खरं वाटायला लागतं. अशात केंद्राकडून महाराष्ट्राला कशाप्रकारे मोठी मदत केली गेली याबाबत फडणवीसांनी माहिती दिली. महाराष्ट्रातला आतापर्यंत केंद्राकडून २८ हजार १०४ कोटींची मदत दिली गेल्याचं फडणवीसांनी पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलंय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT