Mumbai Sakal
मुंबई

"ठाण्याच्या" धर्तीवर "कल्याण"मधील प्रयोगही यशस्वी

सायंकाळचे 3 तास खासगी बसना स्टेशन परिसरात नो एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - लोकलबंद (Local) असल्याने चाकरमानी खासगी (Private) वाहनाने प्रवास करतात. यामुळे खासगी बसेसचीही संख्या गेल्या वर्षभरात वाढली आहे. या खासगी बसेसमुळे कल्याण पश्चिम (kalyan) स्टेशन (Station) परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाने सायंकाळचे 3 तास स्टेशन परिसरात खासगी बसना प्रवेश बंद (Close) करीत वाहतुकीत बदल केला आहे.

ठाण्याच्या (Thane) धर्तीवर 23 ऑगस्ट पासून हा प्रयोग राबविला जात असून तो 70 टक्के कोंडी फोडण्यास यशस्वी झाला असल्याची माहिती कल्याण (Kalyan) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक सुखदेव पाटील (Sukhdev Patil) यांनी दिली.

मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई परिसरातून नोकरदार वर्गाला घेऊन येणाऱ्या खासगी बसेसची संख्या वाढली आहे. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणारे प्रवासी, एसटी स्टँड, रिक्षा थांबा यामुळे वाहतूक कोंडी होत असताना त्यात स्टेशन परिसरात सुरू असलेले स्मार्ट सिटीचे काम व खासगी बसेसची भर पडल्याने वाहतुकीवरील ताण वाढला होता. ठाण्यातही अशी समस्या निर्माण होत असल्याने काही वर्षांपूर्वी ठाणे वाहतूक विभागाने स्टेशन परिसरातील खासगी बसेसची वाहतूक बदल केला होता.

त्याच धर्तीवर कल्याण स्टेशन परिसरात हा प्रयोग राबविण्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी ठरविले. त्यानुसार सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत खासगी बसेसना स्टेशन परिसरात बंदी करत पर्यायी मार्ग देण्यात आला. 23 ऑगस्ट पासून हा प्रयोग राबविला जात असून यामुळे स्टेशन परिसरातील 70 टक्के कोंडी फोडण्यासाठी त्याचा उपयोग झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यापासून रेल्वे स्थानक परिसरातील वलीपीर रस्ता भागातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या रस्त्याने जाणारी वाहने लोकग्राम वस्तीमधून पत्रीपूल दिशेने वळविण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

*खासगी बसमधून दररोज 5 ते 7 हजार प्रवासी प्रवास करतात. स

*सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत खासगी बसेसना वेळ आणि शहरातील कमी वर्दळीच्या ठिकाणी थांबे निश्चित करण्यात आले आहेत.

*खासगी बसना कल्याण स्टेशन परिसरातील व्यापारी पेठचा रस्ता सायंकाळी 3 तासासाठी बंद केला आहे.

*खासगी कंपनीच्या बससाठी दुर्गाडी चौक, मुरबाड रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह, सम्राट चौक, विठ्ठलवाडी, सनई मंगल कार्यालय, लाल चौकी, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे थांबा देण्यात आला आहे.

*प्रवासी उतरल्यानंतरही या बस शहरात न येता आल्या मार्गे परत जातील.

*भिवंडीकडून येणाऱ्या वाहनांना गोविंदवाडी बायपास मार्गे कल्याण पत्रीपूल एपीएमसीकडून सिनेहॉलपर्यंत जाऊन तिथूनच माघारी जावे लागेल.

*पडघ्याकडून येणाऱ्या वाहनांना आधारवाडी चौक, दुर्गाडी मार्गे गोविंदवाडी बायपासवरून सिनेहॉलपर्यंत येऊन प्रवाशांना उतरवावे आणि तिथून परत जावे लागेल.

*विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या बसेसना गोविंदवाडी बायपास पत्रीपूल, चक्कीनाका श्रीराम चौकातून इच्छित स्थळी आणि उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या बसेसनी बिर्ला कॉलेजमार्गे शहाड पुलावरून यू टर्न घेऊन चोपडा कोर्टमार्गे इच्छित स्थळी मार्गस्थ व्हावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT