मुंबई

Fake TRP Case: रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक

पूजा विचारे

मुंबईः फेक टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी ही कारवाई केली आहे. फेक टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत १३ लोकांना अटक केली आहे.

फेक टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानीची चौकशी सुरु आहे. याआधी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला. तसंच रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्माम सिंहला देखील या प्रकरणी अटक केली होती. विकास खानचंदानीला अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचद्वारे १२ लोकांना अटक करण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या फेक टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. बॅरोमीटर बदलून टीआरपी संख्या वाढवली जात होती. मुंबई पोलिसांनी या संबंधित कारवाई करत काही लोकांना अटक केली. अटक केलेल्या सर्वांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशी दरम्यान आरोपी लोकांना रिपब्लिक टीव्ही चॅनेलचं भाडं देऊन चॅनेल बघण्यासाठी भाग पाडत होते.

रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या टीआरपीमध्ये घोटाळा असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. पोलिसांचं म्हणणं आहे की, बॅरोमीटर बदलून टीआरपीचा आकडा वाढवण्यात येत होता.  समोर आलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात BARC आणि हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांनी सुरु केलं होतं. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, यात फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही चॅनेल्सना ही चुकीट्या पद्धतीनं टीआरपीचा फायदा मिळाला आहे.

Fake trp scam case Republic TV CEO Vikas Khanchandani Arrested

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT