मुंबई

आज 'भारत बंद' ! आज काय सुरु, काय बंद राहणार याची संपूर्ण यादी 

प्रशांत कांबळे

मुंबई, ता. ८ : 'भारत बंद' च्या पार्श्वभूमीवर राज्यात एसटीच्या फेऱ्या नियमित धावणार आहे. तर  बंदला अतिसंवेदनशील किंवा हिंसक वळण येण्याची शक्यता असलेल्या भागातील एसटीची सेवा स्थानिक पाळीवरील पोलिसांच्या सूचनेवरून बंद करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

देशातील कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून केंद्र सरकारशी चर्चा होऊनही मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी म्हणजेच ८ तारखेला भारत बंद पुकारला आहे. राज्यातील सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा दर्शविला असून, यशस्वीरीत्या पार पाडण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. 

त्यासोबतच 'ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस' सुद्धा भारत बंदमध्ये सहभागी होणार असून, राज्यातील वाहतूकदार सुद्धा भारत बंद मध्ये सहभागी होणार आहे

मुंबईत टॅक्सी सुरूच :  

आधीच कोरोनाच्या काळामुळे टॅक्सी चालकांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे टॅक्सी बंद ठेवता येणार नसल्याने मुंबई उपनगरातील टॅक्सी सेवा सुरूच राहणार आहे. उलट भारत बंदच्या दरम्यान मुंबई पोलिसांनी टॅक्सी व्यावसायिकांना सुरक्षा देण्याची मागणी टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए एल क्वाड्रोस यांनी केली आहे.

रिक्षा चालकांकडून प्रवासी वाहतूक सुरू

रिक्षा चालकांना अद्याप राज्य सरकारने अधिकृत परवानगी दिली नाही. तरीसुद्धा रिक्षा चालक आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालकांकडून प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे भारत बंदसाठी रिक्षा संघटनेला कोणतीही अधिकृत घोषणा करता येणार नसल्याचे रिक्षा चालक-मालक संघटनांनी सांगितले आहे.

मध्य, पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या सुरूच राहणार

मंगळवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील नियमित लोकल फेऱ्या धावणार आहेत. मात्र, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडेकोट लावण्यात आली आहे. आरपीएफ पोलिसांचे रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर तैनात करण्यात आले असून, पश्चिम रेल्वेचे कंट्रोल रूम पूर्णपणे अलर्ट आहे. उद्याच्या परिस्थितीवर लोकल सेवा सोडण्याचा निर्णय घेतले जाणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले आहे।. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या सुद्धा सुरूच राहणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.

आरपीएफ आणि जीआरपीएफ मिळून पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अतिरिक्त स्टाफ सुद्धा अनेक ठिकाणी नियुक्त केले आहे. दादर, अंधेरी, बोरिवली, विरार, भाईंदर या स्थानकावरील सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे असं पश्चिम रेल्वे जीआरपी आयुक्त विनीत खर्ब म्हणालेत.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधात होणाऱ्या संपास राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचा देशपातळीवर सक्रीय पाठिंबा आहे. तर एसटी महामंडळातील इंटक संलग्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचाही पाठिंबा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भूमिका न बदल्यास आगामी काळात शेतकरी आणि कामगार कायद्यातील बदलाविरोधात संप करण्यात येईल असं मुकेश तिगोटे,
(सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)) ने म्हटलंय.

farmers protest bharat bandh what will be closed what will remain open during bandh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT