अलिबाग - रायगड जिल्हयामध्ये येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात वादळी वाऱ्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे रायगड जिह्यातील मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये असे, आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसात बहरलेले भात पिक आडवे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यात येत्या 14 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या किनारपट्टीवर खराब हवामानाबरोबरच ताशी 40 ते 50 किलो मीटर इतके वादळी वारे निर्माण होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान कार्यालयाकडून व्यक्त आला आहे. या वादळी पावसात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी कुठेही अडकून नुकसान होऊ नये. जिवीतहानी बरोबरच वित्तहानी होऊ नये यासाठी या कालावधीत बोटी नजीकच्या बंदरावर आश्रयासाठी लावण्यात यावेत. तसेच खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास बंदी आहे, असे सुरेश भारती यांनी सांगितले आहे.
-----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.