मुंबई

लोकांची नजर चुकवून १३ जण गेलेत धबधब्यावर पिकनिकला, तिथेच गाठलं मृत्यूने; गावावर पसरली शोककळा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - गुरुवारी पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये पाच तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कालमांडवी धबधब्यावर गुरुवारी दुपारी हे तरुण गेले होते, यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. काही तासांच्या शोधमोहिमेनंतर बचावकर्त्यांनी सायंकाळी त्यांचे मृतदेह बाहेर काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली. लॉकडाऊन असल्यामुळे जिल्ह्यात दुकाने आणि सर्व कामे बंद आहेत. म्हणून तरुण पोहण्यासाठी या धबधब्यावर गेले होते. जव्हारपासून काही किलोमीटर अंतरावर हा कालमंडावी धबधबा आहे. 

जव्हारमधील अंबिका चौकातील एकूण 13 जण पिकनिकसाठी कालमंडवी धबधब्यावर गेले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते तिथे पोहोचले. त्यातले दोघं जण सेल्फी घेत होते. त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले, असं जव्हारचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे म्हणाले.

या दोघांना वाचवण्यासाठी अन्य तिघांनी पाण्यात उडी घेतली. पण ते सुद्धा बुडाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  • देवेंद्र वाघ - वय 28
  • प्रथमेश चव्हाण- वय 20
  • देवेंद्र पलटणकर- वय 19
  • निमेश पाटील- वय 28
  • रिंकू भोईर- वय 22

अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती कळताच लेंगरे आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. संध्याकाळी 7च्या सुमारास बचावकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आदिवासी शहरातील दाभोसा धबधब्यानंतर कालमंडावी धबधबा पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे. हा धबधबा कमीतकमी 100 मीटर खोल असून तो वर्षभर वाहत असतो. 

मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्या याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

five people lost their life at kalmandavi waterfall at jawhar read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT