Lakhimpur Kheri Violence
Lakhimpur Kheri Violence  Team eSakal
मुंबई

मुंबईच्या 'त्या' पोलीस आयुक्तांची कोर्टात धाव, राज्य सरकारविरोधात याचिका

ओमकार वाबळे

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला होता. (Maharashtra Bandh) त्याच्याविरोधात माजी मुंबई पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो (Julio Ribeiro) यांची मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली.

'हा बंद राज्य सरकार पुरस्कृत होता. ज्या सरकारी व्यवस्थेने बंदमुळे नुकसान होणाऱ्या लोकांच्या हितांचे रक्षण करणे अपेक्षित असते, त्यांनीच बंदला समर्थन दिले. त्यामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावे', असं रिबेरो यांनी याचिकेत नमूद केलं.

या प्रकरणी राज्य सरकारला ३१ जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) निर्देश दिले आहेत. याचिकादारांना १३ फेब्रुवारीपर्यंत प्रत्युत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने १४ फेब्रुवारी २०२२ रोजी याची सुनावणी ठेवली आहे. (Bombay High Court on Lakhimpur Kheri)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT