मुंबई

14 वर्षांनंतर झाला हत्येचा उलगडा, आरोपींना दिल्लीतून अटक 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मलबार हिल भागात 14 वर्षांपूर्वी पाच जणांनी काही हजारांसाठी मित्राचीच हत्या केली होती. मारेकऱ्यांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून चादरीत बांधले आणि गाठोडे राजभवनामागील समुद्रात फेकून मुंबईबाहेर पळ काढला होता. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली आहे. 

नौदलाच्या अधिकाऱ्यांना मार्च 2006 मध्ये मुंबईतील राजभवनामागील समुद्रात एका गाठोड्यात बांधलेला मृतदेह सापडला होता. ही माहिती मिळाल्यावर मलबार हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. याच भागात राहणारा रणसिंग ऊर्फ करणसिंग वाल्मीकी बेपत्ता असल्याची तक्रार काही दिवसांनी त्याच्या मेव्हण्याने दिली होती. तो मृतदेह रणसिंगचा असल्याची ओळख पटली. 

पोलिस या गुन्ह्यात 2006 पासून आरोपींचा शोध घेत होते. रणसिंगच्या हत्येनंतर वेगवेगळ्या ठिकाणी पळालेले आरोपी पुन्हा गावी गेले नव्हते; तसेच त्यांच्याबाबत गावातील रहिवाशांकडे कोणतीही माहिती नव्हती. मलबार हिल पोलिसांकडे हे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. सतपाल नथूबाबू वाल्मीकी हा आरोपी हरियाणातील फरीदाबाद येथील कृष्णा कॉलनी झोपडपट्टीत पत्नीसह राहत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. 

पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री 2 वाजता त्याला जेरबंद केले. त्याच्या चौकशीतून बाबाजी वाल्मीकी हा अन्य एक आरोपी नवी दिल्लीतील मालवीय नगर भागात जगदंबानगर झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागल्यामुळे बाबाजी पत्नीसह पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला अटक केली. 

फक्त 15 हजारांसाठी... 

हत्या झालेल्या रणसिंगने धरमपाल, प्रेमपाल, वीरपाल ऊर्फ वीरसिंग सतपाल, प्रेमपाल ऊर्फ बाबाजी या गावाकडील मित्रांना 15 हजार रुपयांची मदत केल्याचे तपासात समोर आले. हे मित्र रणसिंगचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होते. त्यावरून झालेल्या वादातून त्यांनी रणसिंगची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे एका चादरीत बांधून ते गाठोडे राजभवनामागील समुद्रात फेकले. त्यानंतर त्यांनी मुंबईतून पळ काढला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT