कांद्याची लागवड करताना शेतकरी. 
मुंबई

या पिकामुळे शेतकऱ्यांचे चेहरे पांढरे

सकाळ वृत्तसेवा

 अलिबाग ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे गेल्या खरीप हंगामात अलिबाग आणि पेण तालुक्‍यीाल शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील या तालुक्‍यांतील महत्त्वाचे पीक असलेला पांढरा कांदाही रोगाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आर्थिक नुकसानीच्या भितीने पांढरे पडले आहेत. बदलत्या हवामानामुळे हे संकट ओढवले आहे. 

खूशखबर : या जिल्ह्यात प्लास्टिक हटवण्यासाठी निधी

अलिबाग तालुक्‍यातील कार्ले, खंडाळे, तळवली, सागाव, मानी, भुते आदी गावांसह पेण तालुक्‍यात रब्बी हंगामात एक हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सफेद कांद्याचे उत्पादन घेतले जाते. चांगल्या प्रतीचा कांदा म्हणून त्याची ओळख आहे. स्थानिक बाजारपेठांबरोबरच राज्यातील अन्य ठिकाणीही त्याला चांगली मागणी आहे. देशभरातून येणारे पर्यटकही तो आवर्जून खरेदी करतात. 

खरीप हंगामातील भातकापणीची कामे झाल्यावर आठ ते दहा दिवसांत सफेद कांद्याची लागवड करण्यात येते. दोन महिन्यांत तो तयार होतो. यंदा मात्र, या पिकाला सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा फटका बसला; तर डिसेंबर, जानेवारीत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तो पुन्हा संकटात सापडला. बदलत्या हवामानामुळे त्याला मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटकनाशकांच्या फवारणीचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. 

हे वाचा : अपघातग्रस्त कारबाबत गुढ वाढले

जयेश पाटील या शेतकऱ्याने सांगितले की, कीडरोगामुळे कांद्याचा उत्पादन खर्च निघणे अशक्‍य आहे. 
कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना पत्र दिले असून तातडीने पंचनामे करण्याचे आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 

या वर्षी पावसाळा लांबणीवर गेला. त्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. मात्र बदलत्या हवामानामुळे त्याची रोपे मुळापासून कुजू लागली आहेत. त्याचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 
- प्रभाकर नाईक, शेतकरी 

सफेद कांदा मुळापासून कुजू लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यंदा उत्पादन घटण्याची भीती आहे. सरकारने कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देऊन भरपाई द्यावी. 
- अशोक घरत, शेतकरी 

बदलत्या हवामानामुळे सफेद कांद्याच्या रोपांवर बुरशीजन्य रोग असल्याचे आढळून आले आहे. तहसीलदारांच्या सूचनेनुसार नुकसानीबाबत पाहणी करून त्याचा अहवाल सरकारला पाठविण्यात येणार आहे. 
- बी. आर. जानुगडे, तालुका कृषी अधिकारी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT