Mumbai Local News Sakal
मुंबई

सेंट्रल व हार्बर लाईनची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

तांत्रिक बिघाडामुळे काही गाड्या बंद असून काही गाड्या उशीरा सुटणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतलं दळणवळणाचं प्रमुख माध्यम असलेली लोकल ट्रेन सध्या खोळंबली आहे. त्यामुळे मुंबईतल्या वेगावर चाप बसला आहे. यंत्रणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा खोळंबा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाकडे जाणाऱ्या, तसंच सेंट्रल आणि हार्बर लाईनवर प्रवास करणाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याविषयीची माहिती दिली आहे. वाशी स्थानकावर सिग्नलिंग यंत्रणेत झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे पहाटे पाच वाजल्यापासून वाहतुकीवर पहिणार झाला आहे. मानखुर्द आणि पनवेल मार्गे डाऊन हार्बर गाड्या धावत नाहीत. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी दरम्यानच्या गाड्या धावत नाहीत.

कोणत्या गाड्या सुरू आहेत?

  • सध्या डाऊन हार्बर लाईनवरील गाड्या सकाळी ६.२५ पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत.

  • अप आणि डाऊन हार्बर लाईन गाड्या सुरू आहेत.

  • ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे आणि नेरुळ/पनवेल - ठाणे गाड्या सुरू आहेत.

  • ट्रान्सहार्बर मार्गावरीलच ठाणे -वाशी-ठाणे गाड्याही सकाळी ६.४५ पासून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Election : गोकुळची ९० दिवसात निवडणूक का घेतली नाही?; उच्च न्यायालयाने शासनावर ओढले ताशेरे, 'इलेक्शन प्रक्रिया लवकर सुरू करा'

Commonwealth Games : मुसळधार पावसात भारताच्या गुरवीर सिंगनं घडवला इतिहास! वाऱ्याच्या वेगासारखा धावत जिंकलं मेडल; Video

Live Marathi News Update : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कथित बनावट पदवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची अभाविपची मागणी

Manoj Jarange Patil : 'आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल'; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलनाची घोषणा

E Pik Pahani Update : शेतकऱ्यांची चिंता मिटली! आता स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज नाही; शासनाचा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय, असा काय केला बदल?

SCROLL FOR NEXT