File Photo 
मुंबई

म्हाडा कर्मचाऱ्यांना सुग्रास जेवण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना सुग्रास जेवण मिळावे म्हणून कॅंटीन चालवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कॅंटीन चालवण्याचा अनुभव असलेल्या ठेकेदारालाच हे काम दिले जाईल, असे निविदेत नमूद करण्यात आले आहे.

म्हाडा मुख्यालयातील कर्मचारी आणि कामासाठी दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या परिसरात सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे उपाहारगृह नाही. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांनाही कॅंटीनशिवाय अन्य पर्याय नसतो. कामानिमित्त सकाळी 10 वाजता आलेले नागरिक तीन ते चार तास म्हाडा कार्यालयात असतात.

त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांसाठी नाश्‍ता आणि जेवणाची चांगली सोय करण्याच्या हेतूने म्हाडा प्रशासनाने मुख्यालयाच्या इमारतीत उपाहारगृह सुरू केले असून, सुग्रास जेवणासाठी अनुभवी ठेकेदाराचा शोध सुरू आहे. म्हाडा मुख्यालयातील कॅंटीन चालवण्यासाठी इच्छुक कंत्राटदाराला 50 पेक्षा जास्त टेबलांचे रेस्टॉरंट किंवा कॅंटीन चालवण्याचा अनुभव असावा, अशी अट घालण्यात आली आहे.

संघटनांची मागणी
मुंबई महापालिकेच्या कॅंटीनमध्ये 10 रुपयांत चांगले जेवण मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवथाळी 10 रुपयांत देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर म्हाडा कॅंटीनचे कंत्राट संपल्यामुळे नव्या कंत्राटदाराने 10 रुपयांत चांगले जेवण द्यावे, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT