मुंबई

वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 30 तारखेला होणार सुनावणी

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 24 : पोलिस अधिकारी परमबीर सिंग आणि ग्रुहमंत्री अनील देशमुख यांच्यातील वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ता 30 रोजी सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आज निश्चित केले. तर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सिंग यांना आता उच्च न्यायालयात याचिका करावी लागेल.

सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज न्या एस के कौल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तुम्ही मंत्र्यांवर आरोप केले आहेत आणि मंत्र्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे असे आम्ही मानतो, पण तुम्ही आधी उच्च न्यायालयात याचिका का करत नाही, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. त्यामुळे आता सिंग उच्च न्यायालयात याचिका करावी लागेल. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी केली आहे.

सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना देशमुख यांनी शंभर कोटी रुपये हॉटेल चालकांकडून वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला आहे. याबाबत देशमुख यांची चौकशी करावी आणि सिंग यांनी आयुक्त पदावर असताना याचा तपास का केला नाही, हेदेखील तपासावे अशी मागणी पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेत केली आहे.

सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत हा तपास करावा कारण सरकार कडून निष्पक्ष तपास होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावर आज न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे उल्लेख करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनीही न्यायालयात जनहित याचिका केली आहे. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाझे  सध्या अटकेत असून उद्यापर्यंत त्यांचा ताबा एनआयएकडे आहे.

hearing on allegation made by parm bir singh on anil deshmukh will be done on 30th march

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT