High court order on decision till September 6 on Express Way toll
High court order on decision till September 6 on Express Way toll 
मुंबई

एक्‍स्प्रेस वे टोलबंदीवर 6 सप्टेंबरपर्यंत निर्णय उच्च न्यायालयाचा आदेश 

सकाळवृत्तसेवा

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) टोलबंदीबाबत राज्य सरकारने 6 सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले. टोलवसुलीतून गोळा झालेल्या नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग होऊ न देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कंत्राटदाराने टोलवसुलीच्या अधिकारांचा गैरवापर करत कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले असेल तर त्यावरही कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

या मार्गावर "म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लिमिटेड'कडून बेकायदा टोलवसुली सुरू असल्याचा आरोप करीत ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर आणि मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी वेगवेगळ्या याचिका केल्या आहेत. त्यांवर न्या. अभय ओक आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी सुरू आहे. टोलवसुलीबाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अहवालात म्हटले आहे; तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वेक्षणातूनही टोल बंद होणार की नाही, हे स्पष्ट होत नाही. या टोलवसुलीबाबत सुमित मलिक समितीने केलेल्या शिफारशींच्या धर्तीवर पीडब्ल्यूडीतर्फे करण्यात आलेल्या स्वतंत्र पाहणी अहवालावर राज्य सरकारने निर्णय घेऊन टोल बंद करायचा की नाही यावर तीन आठवड्यांत अहवाल सादर करावा. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील सहा आठवड्यांत राज्य सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, असे खंडपीठाने स्पष्ट केले. 

सप्टेंबर 2016 मध्ये 1300 कोटी रुपये कंत्राटदाराला देऊनही एक्‍स्प्रेस वे ताब्यात का घेतला नाही? गेल्या 23 महिन्यांत कंत्राटदाराला अतिरिक्त 1500 कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम अपेक्षित रकमेपेक्षा जास्त आहे, या याचिकाकर्त्यांच्या दाव्यातील बाबी पडताळण्याच्या सूचना देत, याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे आदेश खंडपीठाने सरकारला दिले. 

न्यायालयाचे प्रश्‍न 
- 2004 पासून किती टोलवसुली? त्यातून कंत्राटदाराने कामाचा खर्च वसूल केला का? 
- सुमित मलिक समितीच्या अहवालानंतर एप्रिल 2016 पासून किती वसुली? 
- अपेक्षित अंदाजापेक्षा कमी टोलवसुलीच्या आरोपांत तथ्य आहे का? एमएसआरडीसीने खुलासा द्यावा. 
- मलिक समितीच्या अहवालावर सरकारने काय केले? 
- एप्रिल 2016 पासून 1,362 कोटी कंत्राटदाराला देण्याचे समितीच्या अहवालात नमूद. त्याचप्रमाणे टोल तिकिटाद्वारे पैसे घेऊन त्याची नोंद दाखवण्यात आली नसल्याच्या याचिकाकर्त्यांच्या मुद्द्यात तथ्य आहे का? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT