sachin sawant
sachin sawant 
मुंबई

परमबीर देशाबाहेर पळाले असतील, तर त्यामागे भाजपाचा हात - काँग्रेस

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) कुठे आहेत? या बद्दल राज्य सरकार आणि तपास यंत्रणांना कुठलीही कल्पना नाहीय, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी गुरुवारी सांगितले. आता काँग्रेसने यावरुन भाजपावर आरोप केला आहे.

"परमबीर सिंग देशाबाहेर पळून गेले असतील, तर निश्चित यामध्ये भाजपाचा हात आहे. त्यांना पळून जाण्यासाठी भाजपानेच मदत केलीय" असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. परमबीर सिंग यांना वाचवणे, त्यांना पाठिंबा देणे हाच भाजपाचा अजेंडा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.

"लक्षात ठेवा एनआयए अँटिलिया प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, सचिन वाजे परमबीर सिंग यांना रिपोर्टींग करत होता. परमबीर पळून गेले असतील, तरे ते एनआयएचे अपयश आहे. चौकीदारचं सरकार काय करतय? नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि परमबीर सिंग पळून गेले त्यावेळी चौकीदारचं सरकार झोपलं होतं" असं सचिन सावंत यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

गृहमंत्री वळसे-पाटील काय म्हणाले?

"ते जर देशाबाहेर गेले असतील, तर ही बाब योग्य नाही. मंत्री किंवा अधिकारी कोणीही असेल तर त्यांना परवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांचं इथे असणं गरजेचं आहे, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याचा हिशोब करायचा आहे, मात्र आम्ही कोणावरही जाणीवपूर्वक कुणाच्या मागे लागून कारवाई करणार नाही, हा सगळा रुटीन कारवाईचा भाग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT